उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप मायावती आणि त्यांचा पक्ष बसपा यांच्याबाबत मवाळ भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. यावेळची यूपीतील निवडणूकीची मुख्य लढत ही भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे चित्र भारतीय प्रसारमाध्यमांनी उभे केले आहे.दुसरीकडे मायावती सुद्धा यावेळी आक्रमकपणे प्रचाराला उतरल्या नाहीत. असे बोलले जात आहे. अशा स्थितीत उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींच्या बसपा चे अस्तित्व काय असेल याबद्दल सर्वच स्तरावर चर्चा सुरु आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अमित शाह यांनीच स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, जाटव आणि मुस्लिम समाजाची मते बसपाला मिळतील.
टीव्ही चॅनल न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले,
“बसपने आपली प्रासंगिकता कायम ठेवली आहे. मला खात्री वाटते की त्यांना मते मिळतील.
किती जागा मिळतील हे सांगू नाही शकत परंतु बसपाला मते मिळतील.” शहा म्हणाले की, “राज्यात मायावतींची स्वतःची अशी पकड आहे.”
वाहिनीला मुलाखत देताना अमित शाह म्हणाले,”जाटव समाजाची वोट बँक बसपा सोबत जाईल. मुस्लिम मतंही मायावतींसोबत मोठ्या प्रमाणात जातील,” यावर,याचा भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न जेव्हा शहा यांना विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की,
याचा भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे मला माहीत नाही.
ते त्या त्या जागेवर अवलंबून असते. पण, मायावतींचे राजकीय अस्तित्व अजूनही संपलेले नाही हे खरे.
मायावतींनी या निवडणुकीत स्वत:ला लो प्रोफाइल ठेवल्याचा दावा केला जात आहे.
या प्रश्नावर शहा म्हणाले की, याचा अर्थ त्यांचा सपोर्ट बेस संपला असा होत नाही.
भाजपच्या मोठ्या नेत्याने मायावतींबद्दल सकारात्मक विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी, खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवडणूक रॅलींमध्ये
बहुजन समाज पक्ष (BSP) आणि मायावतींविरोधात जास्त आक्रमक भूमिका दाखवलेली नाही.
दरम्यान,एका मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याना त्यांच्या बसपाबद्दलच्या मवाळ वृत्तीबद्दल प्रश्न विचारला गेला,उत्तर देताना ते म्हणाले की, “आमचा कोणत्याही पक्षाशी करार नाही. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाप्रमाणेच बसपाही भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी तीन विरोधी पक्ष लढत आहेत. भाजपा 2014 (लोकसभा). 2017 (विधानसभा निवडणुका) आणि 2019 (लोकसभा निवडणुका) च्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आम्ही बहुमताने सरकार स्थापन करू.
उत्तरप्रदेशात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा करत त्यांनी निवडणुकीनंतर बसपासोबत युती करण्याची शक्यता मात्र फेटाळून लावली आहे.
इतर वाचनीय लेख/बातम्या
कर्नाटक:डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा हटवली;दलित संघटनांची महारॅली
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 22, 2022 13:11 PM
WebTitle – Uttar Pradesh election Amit Shah’s big statement – “BSP is not over yet”