मुंबई: बिल्किस बानो प्रकरण : 2002 च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानो वर (Bilkis Bano case) झालेल्या सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येतील 11 दोषींची सुटका करण्याची गरज नव्हती. असं 14 वर्षांपूर्वी या लोकांना दोषी ठरवणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटलंय. एका विचारसरणीच्या लोकांच्या वतीने गुन्हेगारांचे मिठाई आणि फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आल्याच्या कृत्यावर त्यांनी टीकाही केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झालेले न्यायमूर्ती यू.डी.साळवी म्हणाले, “ज्यानी हा निर्णय घेतला, त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. मी एवढेच सांगू शकतो.” ते म्हणाले, “हे प्रकरण प्रत्येक प्रक्रियेतून गेले आणि आपल्या सर्वांना माहित आहे की या 11 दोषींना सर्व पुराव्यांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आता सरकारने नंतर काय विचार केला, हा एक प्रश्न आहे.”
“सरकारला ‘माफी’ देण्याचा अधिकार आहे पण…
न्यायमूर्ती साळवी म्हणाले, “सरकारला ‘माफी’ देण्याचा अधिकार आहे पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूंचा विचार केला पाहिजे अन्यथा असं करणं योग्य ठरत नाही. त्यांनी ही प्रक्रिया स्वीकारली आहे की नाही हे मला माहीत नाही. ” ते म्हणाले, “काय त्यांनी या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायमूर्तींना केली त्यांचे म्हणने ऐकले ?, मी यावर म्हणेन की मी सांगू शकतो की मी याबद्दल काहीही ऐकले नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला आहे. अशा प्रकरणांमध्ये राज्य सरकारनेही केंद्र सरकारशी सल्लामसलत केली पाहिजे. त्यांनी असं केलं आहे काय? मला कल्पना नाही. जर त्यांनी केले असेल तर केंद्र सरकारने या संदर्भात काय म्हटलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
बिल्किस बानो प्रकरणातील (Bilkis Bano case)दोषींना सोडण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
या याचिकेत सर्व दोषींच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या खटल्यातील दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अधिवक्ता अपर्णा भट यांच्या निवेदनाची दखल घेतली.
त्यानंतर, न्यायालयाने याचिका सूचीबद्ध करण्याचा विचार करण्यास सहमती दर्शविली.
गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती आणि या दंगलीत बिल्किस बानो च्या कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता.
इतकेच नाही तर दंगलखोरांनी बिल्किस बानो वरही सामूहिक बलात्कार केला होता.
सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र आता त्यांची सुटका झाली
21 जानेवारी 2008 रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात
सर्व 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली.
या दोषींनी 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढला, त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने
त्याच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला 1992 च्या धोरणानुसार त्याची शिक्षा माफ करण्याच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर सरकारने एक समिती स्थापन करून सर्व दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश जारी केले.
बिल्किस बानो प्रकरण काय आहे? जाणून घ्या
Bilkis Bano case गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या आणि या दंगलीत ३ मार्च २००२ रोजी दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानो च्या कुटुंबावर हल्ला केला. बिल्किस बानो, जी त्यावेळी पाच महिन्यांची गर्भवती होती, तरीही तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता इतकच नाही तर तिच्या हातात असणाऱ्या तीन वर्षीय मुलीलाही मारून टाकलं होतं, तसेच तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची या दंगलखोरांनी निर्घृणपणे हत्या केली होती.
या घटनेनंतर बिल्किस बानो किमान तीन तास बेशुद्ध पडल्या होत्या. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एका आदिवासी महिलेकडे कपडे मागितले. त्यानंतर ती एका होमगार्डला भेटली, जो तिला लिमखेडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घेऊन गेला. तेथे हवालदार सोमाभाई गोरी यांनी तिची फिर्याद लिहून घेतली. मात्र नंतर हवालदार गोरीला नंतर गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून तीन वर्षांची शिक्षा झाली.
बिल्कीस बानो ला गोध्रा रिलीफ कॅम्प आणि तेथून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले.आणि गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती.बिल्कीसला गोध्रा रिलीफ कॅम्प आणि तेथून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचलं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले.आणि गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली होती.
एका महिलेला दिल्या गेलेल्या न्यायाचा हाच शेवट : बिल्किस बानो
बिल्किस बानो भावूक होऊन म्हणाल्या की, माझे कुटुंब आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि माझ्या 3 वर्षाच्या मुलीला हिसकावून घेणारे 11 गुन्हेगार मोकळे सोडले गेले हे ऐकून मी स्तब्ध झाले. मला अजूनही धक्क्यात आहे. आज मी एवढेच म्हणेन की – कोणत्याही स्त्रीला असा न्याय कसा मिळेल? माझ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयांवर माझा विश्वास होता. मी आपल्या सिस्टमवर (व्यवस्थेवर) विश्वास ठेवला आणि हळूहळू माझ्यावर झालेल्या आघातासोबत जगणे शिकत होते. मात्र या दोषींच्या सुटकेने माझी शांतता हिरावून घेतली आहे आणि माझा न्यायावरील विश्वास डळमळीत झाला आहे. माझे दु:ख आणि माझा डळमळीत विश्वास केवळ माझ्यासाठीच नाही तर न्यायालयांमध्ये न्यायासाठी लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आहे.
Sonali Phogat सोनाली फोगाट या भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टारचं निधन
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 23,2022, 19:58 PM
WebTitle – The former judge who pronounced the sentence in the Bilkis Bano case raised questions on the acquittal of the convicts