मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात फोडाफोडी, इडीची भीती,त्यातून झालेलं सत्ता नाट्य थांबण्याचे नाव घेईना असे चित्र सध्या दिसत आहे. शिवसेना (Shivsena) हा अख्खा पक्ष फुटून त्यातून अनेक बंडखोर आमदार भाजप सोबत गेले,आणि राज्यातील महाविकास आघाडी ची सत्ता हातोहात गेली.या धक्क्यातून राजकीय नेते,राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक आणि कार्यकर्ते सुद्धा सावरले नव्हते तोवर आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आता (Congress) काँग्रेस चे सात आमदार भाजप च्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप हा दुसऱ्या तिसऱ्या बाहेरच्या कुणी केला नसून काँग्रेस मधिलच एक महत्वाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस ला (Congress) पराभवाचा मोठा सामना करावा लागला होता.या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ते पराभूत झाले.काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा एकूण मतांचा कोटा हा २९ होता,मात्र चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मतेच मिळाली होती.
राज्यसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेवर फोडले होते.
अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती.निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती.असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.
शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.
दुसरीकडे,विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी जाहीर केली होती.
विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे त्यांच्या एकूण ४४ आमदारांची मते होती. काँग्रेसच्या हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना देण्याचे आदेश होते.
मात्र या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप (Bhai Jagtap) यांचा विजय झाला तर पहिल्या पसंतीचे असणारे चंद्रकांत हंडोरे मात्र पराभूत झाले. यावरून काँग्रेस आमदारांनी पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झालं. याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना केवळ २२ मते पडली,
म्हणजे 29 पैकी सात जणांनी भाजपला मतदान केले, असा स्पष्ट आरोपच पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
एवढेच नाहीतर त्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी करत
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे तक्रार केलीय.
या आमदारांनी भाजपला मते दिली असतील तर हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा अर्थ निघतो.
असा खळबळजनक आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यमांशी बोलताना केला आहे.
चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्याने दलित समाजात चुकीचा संदेश गेला आहे. हे प्रकरण दडपून टाकलं तर पक्षातील बेशिस्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. मतदान करताना कोडिंग करण्यात आले होते. त्यामुळे कुठल्या आमदारांनी मतदान केलेले नाही हे आम्हाला माहीत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय,यावर आता काँग्रेस चे पक्षश्रेष्ठी काय कारवाई करतात? ते सात आमदार कोण? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
‘Natchathiram Nagargirathu’ first look:पा रंजितचा नवा चित्रपट पोस्टर
चार हात चार पाय असलेलं मूल;लोक म्हणाले ‘देवाचा अवतार’..
जम्मू मध्ये पकडलेला लष्करचा दहशतवादी भाजप चा आयटी सेल प्रमुख
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 06, 2022, 23:15 PM
WebTitle – Seven Congress MLAs in touch with BJP – claims Prithviraj Chavan