जालोर : तहान लागली म्हणून लहानगा विद्यार्थी इंद्र कुमार मेघवाल माठातून पाणी प्याला,म्हणून चिडलेल्या जातीयवादी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण करत जीव घेतला,असा आरोप इंद्र कुमार मेघवाल च्या पालकांनी केला आहे.जातीयवादी शिक्षकाने इंद्र कुमार मेघवालला यासाठी मारलं कारण तो तथाकथित हिंदू-दलित समाजातील एक घटक होता.हिंदू धर्मात अमानवी पद्धतीची जात व्यवस्था आजही अस्तित्वात आहे.आणि या व्यवस्थेला आजही मानणारे लोक हिंदू समाजात आहेत.यातून आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असणाऱ्या लोकांचा,त्यांच्या जातीच्या आधारे द्वेष करणे त्यांना मारहाण करणे भेदभाव करणे असले प्रकार हिंदू धर्मात आजही पाहायला मिळतात.
मात्र क्रूरता इथेच थांबत नाही.तर एखाद्याने अशा हिंदू-दलित व्यक्तीचा तथाकथित उच्च जातीय हिंदू धर्मीयाने खून केला,मारहाण केली तर इतर लोक जातीयवादी गुन्हेगारांच्या बचावासाठी मोठ्याप्रमाणात एकत्र येत असल्याचे चिंताजनक चित्र गेल्या काही वर्षात दिसायला लागले आहे.यातूनच हाथरस येथे पंचायत भरते,आणि बलात्कार करून खून केलेल्या मुलीच्या कुटुंबावरच दबाव टाकण्याचे काम केले जाते.गावात इतरांना प्रवेश नाकारला जातो, आवाज दाबला जातो.असाच प्रकार राजस्थान मध्ये घडला आहे.
इंद्र कुमार च्या वडिलांना जेल,शिक्षकाला जामीन द्या
आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली त्या अनुषंगाने आपल्याकडे काही व्यवस्था आहेत,पोलिस प्रशासन,न्यायव्यवस्था ,कायदे इत्यादी जर कुणी कायदे मोडले गुन्हा केला तर लोकशाहीत अस्तित्वात असणाऱ्या या व्यवस्थेनुसार पुढील कारवाई केली जाते.त्याचा तपास केला जातो.गुन्हा नोंद होतो,खटला दाखल होतो,पुरावे गोळा केले जातात आणि न्यायालयात ते सिद्ध झाल्यावर दोषी व्यक्तीस शिक्षा सुनावली जाते.सभ्य समाज म्हणून ही व्यवस्था स्वीकारली गेली आहे,मात्र अलिकडे काही लोक स्वत:च व्यवस्थेला पर्याय निर्माण करत आहेत.
स्वत:चं चिथावणीखोर धमकी युक्त भाषणे देत त्यात न्यायदान देखील केले जात आहे.
खरतर प्रकरण सुरू असताना त्यावर दबाव टाकणे तसे वातावरण निर्माण करणे या गोष्टी न्यायाला अव्हेरण्या सारख्या आहेत.
न्याय मिळू नये यासाठी केल्या जातात असाच प्रकार इंद्र कुमार मेघवाल च्या केसमध्ये सुरू झाला आहे.
जालोर जिल्ह्यातील ३६ इतर जातीय घटकांनी मोठ्याप्रमाणावर एकत्र येऊन मारहाण करणाऱ्या शिक्षकासाठी सहनुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.हे एवढ्यावरच थांबलं नाहीतर,मुलाचा मृत्यू मारहाण केल्याने झालाच नाही,असे दावे भाषणातून केले जात आहेत,इतकच नाही तर २५ लाखासाठी वडिलांनीच मुलाचा खून केला नाही ना ? असा निर्दयी प्रश्नच भाषणातून विचारत वडलांची चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाका आणि शिक्षकाला जामीन द्या अशा मागण्या शेकडोने जमलेल्या जमावाच्या समोर भाषणामधून करण्यात आल्या आहेत.
शाळेत पिण्यासाठी माठ नसल्याचा दावा
आता आणखी एक मुद्दा समोर येत आहे,शाळेतील काही शिक्षक आणि विद्यार्थी यांनी शाळेत पिण्याचे पाणी साठवण्यासाठी असा कोणताही माठ ठेवला जात नसल्याचा दावा केला आहे.शाळेत आजही पाणी पिण्यासाठी दोन माठ ठेवण्याच्या जागा आहेत,मात्र तिथे मडके नाहीत,आणि मडके ठेवले जात नाहीत असा दावाही करण्यात आला आहे.तसेच यासाठी एक सीमेन्टची टाकी दाखवली जात आहे. तिथे दोन नळ आहेत.यातून विद्यार्थी आणि शिक्षक पाणी पितात असा दावा करण्यात आलाय.
पोलिसांनी पीएम रिपोर्ट उघड केला नाही
मृत विद्यार्थ्याचा (पीएम रिपोर्ट) शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला असला तरी अद्याप पोलिसांनी अहवाल सार्वजनिक केला नाही.
तपास पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
तहान लागली म्हणून माठातून पाणी प्याला जातीयवादी शिक्षकाने जीव घेतला
भाजप महिला नेत्याने आदिवासी महिलेस शौचालय चाटण्यास व मूत्र प्राशन करण्यास भाग पाडलं
धुळे येथे बौद्ध समाजावर मनुवाद्यांनी टाकला बहिष्कार,पाणी,दूध,किराणा,बंद
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 03,2022, 12:40 PM
WebTitle put-indra-kumars-father-in-jail-grant-bail-to-the-teacher-threatening-speeches-in-rajasthan