मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये चार दिवस ताब्यात घेतलेले विमान मंगळवारी २७६ प्रवाशांना घेऊन मुंबईत पोहोचले. या विमानात बहुतांश भारतीय नागरिक होते. रोमानियन कंपनीद्वारे संचालित निकाराग्वाला जाणारे फ्लाइट पॅरिसच्या पूर्वेला 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैट्री विमानतळावर चार दिवस थांबवण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, एअरबस A340 विमान पहाटे 4 च्या सुमारास मुंबईत पोहोचले. स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीच वाजता विमानाने वैट्री विमानतळावरून उड्डाण केले.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबईहून 303 प्रवाशांना घेऊन निकाराग्वाला जाणारे विमान मानवी तस्करीच्या संशयावरून गुरुवारी पॅरिसपासून 150 किमी पूर्वेला वैट्री विमानतळावर थांबवण्यात आले. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,मुंबईसाठी निघालेल्याविमानात २७६ प्रवासी होते आणि दोन अल्पवयीन मुलांसह २५ जणांनी फ्रान्समध्ये आश्रयासाठी अर्ज केला आहे आणि ते सध्या फ्रान्समध्ये आहेत. इतर दोन प्रवाशांना आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, त्यांनंतर त्यांना सोडून देण्यात आले, असे फ्रेंच वृत्तवाहिनीने सांगितले.
अनेक प्रवाशांना पुन्हा देशात परतायचे नाही
पॅरिसजवळील विमानतळावर फ्रेंच अधिकाऱ्यांनी थांबवलेले विमान सोमवारी मुंबईच्या उड्डाणासाठी उशीर झाला,
कारण त्यातील काही प्रवाशांना आपल्या देशात परतायचं नव्हतं. हे उड्डाण थांबवताना विमानात 303 प्रवासी होते, त्यापैकी बहुतांश भारतीय आहेत.रोमानियन एअरलाइन लीजेंड एअरलाइन्सच्या वकील लिलियाना बाकायोको यांच्या मते, परिस्थिती खूपच गोंधळात टाकणारी असेल.
त्यांनी फ्रेंच मीडियाला सांगितले की, काही प्रवाशांना त्यांच्या मूळ देशात परत यायचे नव्हते आणि सुरुवातीला सोमवारी सकाळी त्यांनी विमानात बसण्यास नकार दिला होता .”काही प्रवासी या घरवापसी मुळे नाखूष असतील कारण त्यांना निकाराग्वा येथेच आश्रय घ्यायचा आहे,” असं फ्रेंच मीडियाने सांगितले. दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत यापैकी चार डझन प्रवाशांनी फ्रांस मध्येच आश्रयासाठी अर्ज दाखल केले आहेत.
प्रवाशांमध्ये 21 महिन्यांचे बालक आणि 11 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे
ज्यांना विशेष प्रशासकीय काळजीमध्ये ठेवण्यात आले आहे. अनेक प्रवाशांनी फ्रान्समध्येच आश्रयाची विनंती केली आहे.
रविवारी विमानतळ एका तात्पुरत्या न्यायालयीन संकुलात बदलले आणि चार फ्रेंच न्यायाधीशांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केली.
मानवी तस्करीच्या संशयाचा तपास म्हणून ही सुनावणी घेण्यात आली.
विमानाला रवाना होण्यासाठी अधिकृत केल्यानंतर फ्रेंच न्यायमूर्तींनी रविवारी प्रक्रियेतील अनियमिततेमुळे सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जागल्याभारत ने या संदर्भात बातमी दिली होती.
भारतातून परदेशात स्थायिक होण्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 26,2023 | 11:00 AM
WebTitle – Indian-Bound Planes Grounded in France Return with 276 Passengers