आजही जगात २०० दशलक्ष लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही व हात धुण्यासाठी साबण किंवा इतर कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. या प्रकरणात, त्यांना कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे.विशेष म्हणजे, जगातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या अजूनही स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.अशा परिस्थितीत गरीब देशांमध्ये हा विषाणू पसरण्याचा धोका मोठा आहे.
पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार यांच्यासह इतर उच्चस्तरीय तज्ज्ञांचे मत आहे की कोविड -19 ची तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे, ती कधी येईल हे स्पष्टपणे सांगता येत नाही, पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये किंवा त्यानंतर येवु शकतो हि लाट आणखी मोठी होण्याची शक्यता आहे, पुन्हा एकदा या पेक्षा भीषण गंभीर परिस्थिती होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस, जेव्हा भारताला वार्षिक एबीसी (एशियन ब्राउन क्लाउड) सामोरे जावे लागेल, ज्यामध्ये हवेतील विषारी पदार्थ एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांत जाऊन हे विषारी पदार्थ माणसाला आजारी करतील , तेव्हा कोविडसारख्या परिस्थितीत हे अधिक धोकादायक होवू शकते.ऑक्सिजन सिलेंडर ची कमी हे तर आहेच .पण शुध्द नैसर्गिक हवा मिळणे हे पण आताच्या काळात दुरापास्त झाले आहे..
एबीसी समजून घेणे महत्वाचे
सर्वात आधी 1999 एबीसी म्हणजे काय हे लक्षात येण्यासाठी नेपाळमध्ये वैज्ञानिक अभ्यास व संशोधन केंद्रे सुरू केली गेली. सरकारांना याबद्दल बर्याच काळापासून माहित आहे, यात काहीच आश्चर्य नाही पण या कडे कधीच गांभीर्यान पाहीले गेले नाही.एबीसी समजून घेणे महत्वाचे आहे की म्हणजे केवळ प्रदूषण नाही.हिमनग वितळवून, सूर्याच्या किरणांची तीव्रता वाढवणे, प्रत्येक आठवड्यात अवकाळी पाऊस आणि शेतीमालाचे उत्पादन कमी होणे यात त्याचा मोठा हात आहे.तिसर्यांदा, एबीसी संपूर्णपणे मानवनिर्मित आहे,ज्यामध्ये नायट्रेट कण (वाहनांचे उत्सर्जन) आणि ब्लॅक कार्बन कण (डिझेल, बायोमास आणि कोळसा पूर्णपणे नष्ट न करणे) व्यतिरिक्त सल्फर कण (ज्वलनशील इंधन तेल) असतात.दुसर्या शब्दांत सांगायचे तर हे सगळी आपली निर्मिती आहे.
पण या मध्ये चांगली बाब अशी आहे की आपण मानव या मानवनिर्मित आपत्तीला काही प्रमाणात रोखू शकते,हे शक्य आहे.
वैज्ञानिक अभ्यासानुसार, गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अवघ्या 53 दिवसांत भारतातील सिंधू-गंगेच्या मैदानी भागातील प्रदूषण पातळी दोन दशकांपूर्वीच्या पातळीवर गेली होती.
इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स इव्हॅल्युएशनने केलेल्या नव्या अभ्यासात ही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
हे संशोधन पर्यावरण आरोग्य परिप्रेक्ष्य या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
या अहवालानुसार, उप-सहारा आफ्रिका आणि आशिया मधील सुमारे ५० टक्के लोकांना हात धुण्याची सुविधा नाकारली आहे.
आयएचएमईचे प्राध्यापक मायकेल ब्रेयर यांनी म्हटले आहे की
“आम्हाला माहित आहे की कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुणे आवश्यक आहे.
परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नसते.
त्यामुळे परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे.
भारतातही ५ कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याचे साधन नाही
“भारतातही ५ कोटीहून अधिक लोकांना हात धुण्याचे साधन नाही या अहवालानुसार ४६ देशांतील निम्म्याहून अधिक लोक हात धुण्याची सुविधा उपलब्ध नाही ते या सुविधेपासुन वंचित आहेत . तर भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि इंडोनेशियासारख्या प्रत्येक देशातील ५ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात पाणी आणि साबण सारख्या हात धुण्याचे मूलभूत साधन नाही.
ब्रेअरच्या म्हणण्यानुसार, हात धुण्याअभावी दरवर्षी सुमारे ७ लाख लोकांचा मृत्यू होतो. या प्रकरणात, कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याचा संभव आहे . तथापि, जगभरात याचा सामना करण्यासाठी हँड सॅनिटायझर, वॉटर ट्रक सारख्या तात्पुरत्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. पण ते पुरेसे नाहीत. हे आजार टाळण्यासाठी दीर्घकालीन व प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील.
त्यांच्या मते, जरी जगातील सुमारे २५ टक्के लोकांमध्ये हात धुण्याची सुविधा नाही, परंतु १९९० ते २०१९ दरम्यान अनेक देशांमध्ये खूप सुधार झाला आहे. सौदी अरेबिया, नेपाळ आणि आफ्रिकन देशांसह मोरोक्को आणि टांझानियाचा समावेश आहे. स्वच्छता क्षेत्रात या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की जर प्रभावी पावले उचलली गेली नाहीत तर कोविड -१९ आफ्रिकेत जवळपास १,९०००० लोकांचा जीव घेतील. व सुमारे ४४ कोटी लोकांना या विषाणूची लागण होईल असे या अहवालात भाकित केले आहे.
भारतालाही या आजाराने ग्रासले आहे आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे.
अशा परिस्थितीत स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही आणि शारीरिक अंतरासारखे नियम पाळले गेले नाहीत
तर देशातील मोठी लोकसंख्या लवकरच बळी पडेल.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)