NEET UG २०२६ परीक्षा रद्द करण्याच्या NTA च्या निर्णयामुळे देशभर खळबळ उडाली आहे. यामुळे मध्य प्रदेशातील कुप्रसिद्ध ‘व्यापम’ घोटाळ्यासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.. २२ लाख विद्यार्थी चिंतेत आणि नैराश्यात असताना नेहमीप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री फॉरेन टूर मध्ये व्यस्त आहेत, त्यांना या विषयावर बोलायला वेळही नाही आणि हिम्मत ही नाही, भाजपचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मूग गिळून बसले आहेत, माध्यमांपासून तोंड लपवून फिरत आहेत
भूतकाळ पाहिला तर दिसून येईल कि सर्वात जास्त पेपर फुटीचे गुन्हे भाजप सत्तेत असताना झाले आहेत.
याचाच अर्थ असा कि मेरिट शिवाय जास्तीत जास्त बोगस डॉक्टर्स भाजपने तयार केले आहेत,
इतका मोठा पेपर फुटीचा घोटाळा भाजप करत आला आहे.
CBI ने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील पुणे, लातूर येथील शिक्षकच पेपर लीकचे सूत्रधार असल्याचे समोर आल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अशा चुकांमुळे UPSC, NEET सारख्या राष्ट्रीय परीक्षांवरील जनतेचा विश्वास उडेल. २२.७९ लाख विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक व मानसिक ताण प्रचंड वाढतो आहे.
1) 1997 मध्ये IIT JEE चा पेपर फुटला होता. लखनऊ मधली घटना , तेव्हा सुद्धा मेडिकल विध्यार्थ्यांना मोठा फटका बसला होता,
परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात अली होती त्यावेळी केंद्रात युनायटेड फ्रंट चे सरकार होते आणि गुजराल हे प्रधानमंत्री होते.
2) 2000 सालच्या सुरुवातीला जेजे हॉस्पिटल मुंबई येथे पेपर फुटीची घटना झाली होती,
एमबीबीएस च्या फायनल पेपर विद्यार्थ्यांकडे झेरॉक्सच्या दुकानात सापडले होते.
यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे भाजप चे सरकार होते
3) 2012 – AAIMS PG मेडिकल परीक्षेचा पेपर फुटला होता तेव्हा सत्तेत मनमोहन सिंग यांचे काँग्रेस चे सरकार होते.
4) 2013 – “व्यापम” घोटाळा सर्वांना आठवत असेल, व्यापम हे मध्य प्रदेशचे व्यावसायिक परीक्षा बोर्ड होते.
हे बोर्ड 2000 ते 2013 दरम्यान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत होते, म्हणजे 13 वर्ष हा घोटाळा भाजप प्रणित एमपी सरकार असताना होत होता.
या 13 वर्षात वार्षिक अंदाजे 32 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, घोटाळ्यात ६३४ डॉक्टरांच्या डिग्री रद्द झाल्या होत्या
मध्यप्रदेश मध्ये तेव्हा भाजपचे शिवराज चौहान मुख्यमंत्री होते
5) 2015 – AIIMS मध्ये केलेल्या 2012 सालच्या घोटाळ्यातील “गॅंग” यावेळी सुद्धा पेपर फुटी प्रकरणात अग्रेसर होते, यावेळी AIPMT म्हणजेच “ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट” चे 10 राज्यात मायक्रो सिम कार्ड आणि ब्लूटूथ चा वापर करून परीक्षेचे पेपर लीक केले गेले होते. यात 700 च्या वर विद्यार्थ्यांना फटका बसला होता. 15 ते 20 लाख रुपयात पेपर विकले गेले होते
2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यावर लगेच पुढच्याच वर्षी हा पेपर घोटाळा झाला होता
6) 2016 – या वर्षी NEET II चे पेपर लीक झाल्याची बातमी पुढे आली होती,
कोर्टात पिटिशन फाईल केली गेली होती परंतु सुप्रीम कोर्टाने काही कारवाई केली नाही
“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”
7) 2020- 21 – तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, या राज्यातून “प्रॉक्सी कॅन्डीडेट” म्हणजेच बोगस परीक्षार्थी बसवून
पेपर सोडवले गेले होते असा आरोप झाला होता, या राज्यातून या बोगस परीक्षार्थींना पकडले गेले होते.
“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”
8) 2024 – यावर्षी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) चे पेपर लीक झाल्याची घटना उघडकीस आली होती, बिहार पाटणा मध्ये पोलिसांना अर्धवट जळालेला परीक्षा पेपर मिळाले होते, यावरून पाटणा केंद्रातून 13 लोकांना पकडण्यात आले होते – प्रत्येकी 30 – 35 लाख रुपयांचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘व्यवस्थागत’ म्हणजेच संपूर्ण परीक्षेत घोटाळा झाला नसल्याने फेरपरीक्षा घेण्याची गरज नाही. मात्र CBI चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले व गैरप्रकारात सहभागी २५० हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.
“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार होते”
9) 2026 – राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) २०२६ चा पेपर फुटल्याचे प्रकरण महाराष्ट्राला हादरवून टाकणारे ठरले आहे.
३ मे रोजी देशभरात २२.७९ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र १२ मे रोजी NTA ने परीक्षा रद्द केली. कारण?
पेपर लीकचा ‘स्रोत’ महाराष्ट्रातच सापडला. CBI ने पुणे, लातूर, अहिल्यानगर येथून ९ जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्रातून फुटला पेपर? – ‘गुरुजी’च बनले गुन्हेगार – CBI तपासात धक्कादायक माहिती समोर आली. पी. व्ही. कुलकर्णी – लातूरच्या दयानंद ज्युनियर कॉलेजचे निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापक. NTA च्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर होते. त्यांनी एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील घरी ‘स्पेशल कोचिंग’ घेतले. विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय व उत्तरे लिहून दिली. ही उत्तरे ३ मे च्या प्रत्यक्ष पेपरशी तंतोतंत जुळली.मनिषा वाघमारे व मनिषा मंधारे – पुण्यातील वनस्पतिशास्त्र शिक्षिका. NTA ने तज्ज्ञ म्हणून नेमले होते. त्यांच्याकडे बायोलॉजीचा पेपर होता. त्यांनीही घरी शिकवणी घेऊन प्रश्न दिले.धनंजय लोखंडे – अहिल्यानगर. वाघमारेकडून पेपर घेऊन शुभम खैरनारला पाठवला.
‘गेस पेपर’ म्हणून १५० पानांचे ४१० प्रश्न WhatsApp वर फिरले.
त्यातील १२० रसायनशास्त्राचे प्रश्न प्रत्यक्ष पेपरशी जुळले. ३० लाख ते ३० हजार रुपयांपर्यंत विक्री झाली.
“केंद्रात नरेंद्र मोदींचे भाजपचे सरकार आहे”
निष्काळजीपणा आणि ‘मॅन्युअल’ पद्धतीचा फटका NEET सारखी महत्त्वाची परीक्षा आजही कागदी स्वरूपात होते.
यावेळी प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या लोकांकडूनच लीक झाली. परीक्षा केंद्रावर 5G जॅमर, AI असूनही उपयोग झाला नाही
उशिरा आलेलं शहाणपण – ३ मे ला परीक्षा झाली, १२ मे ला रद्द केली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवास, हॉटेलवर लाखो खर्च केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली – पुढील वर्षापासून NEET पूर्णपणे ‘कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट’ (CBT) होईल. यामुळे छपाई, वाहतूक, साठवणुकीतील मानवी हस्तक्षेप कमी होईल. पण यात एक समस्या आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांकडे कॉम्प्युटर नाही, त्यांना वगळले जाईल.
या अशा सततच्या पेपर फुटीतून विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होत आहेत आर्थिक, मानसिक नुकसान तर आहेच
परंतु येणाऱ्या काळात मेडिकलला जाणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खच्चीकरण होणार आहे, याला जबाबदार कोण ?
२२.०५ लाख विद्यार्थी पेपर फुटीला बळी पडले आहेत. हि भारताची भावी पिढी आहे यांच्या मनाशी, भविष्याशी खेळण्याचा अधिकार भाजप ला कुणी दिला ? या परीक्षांच्या तयारीसाठी कुटुंबे २.५-३ लाख खर्च करतात. आता पुन्हा परीक्षा २१ जूनला. प्रवास, राहण्यासाठी पुन्हा खर्च. सूत्रांनुसार “५ लाख विद्यार्थी पैसे वाचवण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपले”. ही परीक्षा रद्द झाल्याने ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. भावनिकदृष्ट्या युवकांना उद्ध्वस्त केल्यामुळे विद्यार्थी – पालक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत “प्रामाणिकपणा तोट्याचा ठरतो का?” असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. २०१७ ते २०२४ मध्ये ७० पेपर लीक प्रकरणे, १.७ कोटी विद्यार्थी या पेपर फुटीचा बळी ठरले आहेत हो अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे
वरील पेपर फुटीच्या घटना पाहता एक लक्षात येतंय कि भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत असतं तेव्हा या अशा प्रकारच्या घटना सर्रास होत असतात, न्यायव्यवस्था सुद्धा भाजपच्या अधिपत्याखाली असल्याने योग्य ती कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही आणि प्रकरण दाबले जाते. भाजपच्या अशा कुकर्मामुळे, बेफिकीर आणि ढिसाळ कार्यपद्धतीमुळे कितीतरी बोगस डॉक्टर आज समाजात फिरत असतील ? कित्येक निष्पाप लोकांचा बळी यामुळे घेतला गेला असेल ?

अमोल गायकवाड
International affairs analyst, social activist, and engineer with over 10 years of freelancing experience in digital and online media. Deeply engaged in the study of political, social, and geopolitical issues, with a strong interest in public discourse, policy, and current affairs.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 18,2026 |20:10 PM
WebTitle – Why do exam papers leak when the BJP is in power






















































