नवी दिल्ली: वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक बुधवारी (३ एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे अरविंद सावंत यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी यावेळी तीव्र विरोध केला.
सभागृहात गोंधळाचे वातावरण
मंगळवारी शून्यकाळात या मुद्द्यावर सभागृहात मोठा गोंधळ झाला. वक्फ विधेयकाच्या विरोधात घोषणा देणाऱ्या खासदारांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार शांततेचे आवाहन केले. शेवटी दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची घोषणा करावी लागली.
विधेयकाची मुख्य वैशिष्ट्ये
– केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी विधेयक सादर करणार – दुपारी १२ वाजता सुरू होणाऱ्या चर्चेसाठी किमान ८ तासांचा वेळ नियोजित – विरोधी पक्षांनी १२ तासांची चर्चा मागितली आहे – विधेयकाचा मुख्य उद्देश वक्फ मालमत्तेचे पारदर्शक व्यवस्थापन
वक्फ विधेयक दुरुस्ती — राजकीय प्रतिक्रिया
किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले की, “हे विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे. वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन पारदर्शक पद्धतीने केले पाहिजे. या विधेयकाला विरोध करणारे काही मूठभर शक्तिशाली लोक आहेत ज्यांनी वक्फ मालमत्तांवर अतिक्रमण केले आहे.”
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रश्न उपस्थित केला की,
“वक्फने मुस्लिमांचे काय कल्याण केले आहे? ही मंडळे केवळ काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थाचे केंद्र व कोणत्याही सरकारी मालमत्तेवर जबरदस्तीने कब्जा करण्याचे माध्यम झाली आहेत.”
विरोधी पक्षांची तयारी
इंडिया आघाडीतील काँग्रेससह विरोधी पक्षांनी मंगळवारी संध्याकाळी बैठक घेऊन विधेयकाविरोधी रणनीती ठरवली.
भाजपासह अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे.
शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष वेचले जात आहे.
संसदेच्या समन्वय सभागृहात झालेल्या या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद सावंत, सुप्रिया सुळे यांच्यासह सपा, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांकडे लोकसभेत किमान २३५ खासदारांचे बळ असल्याचे सांगितले जाते.
बीएसी बैठकीत तीव्र विरोध
बीएसी बैठकीत सरकारने विरोधकांना बोलू दिले नाही अशा आरोपाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बैठक सोडली. बाहेर पडल्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अरविंद सावंत यांनी म्हटले, “सरकारने लोकशाही प्रक्रियेचा पायमोड केला आहे.”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 03,2024 | 09:35 AM
WebTitle – Waqf Amendment Bill