गडचिरोली : मौजे नवरगाव (गिरगाव) तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे नोव्हेंबर महिन्यात 10 तारखेला नवरगाव बस स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामफलक जातीयवृत्तीच्या व्यक्तींनी काढला.यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले,सदर फलक मौजे नवरगाव (गिरगाव) येथील ग्रामसभेत ठराव आणून पास करून घेण्यात आला होता,तसेच त्याचे रीतसर अनावरण करण्यात आले होते,अशी माहिती ग्रामस्थ देत आहेत.असे सोशल मिडियातील शेअर केलेल्या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे.हा फलक जातीयवादी मानसिकतेतून काढून घेण्यात आल्याचा आरोप करत मौजे नवरगाव (गिरगाव) तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील बौद्ध समाजाने गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
![नवरगाव गडचिरोली येथील बौद्ध समाजाने गाव सोडले The Buddhist community of Navargaon Gadchiroli left the village](https://jaaglyabharat.com/wp-content/uploads/2023/12/The-Buddhist-community-of-Navargaon-Gadchiroli-left-the-village.webp)
काय आहे नेमके प्रकरण?
मौजे नवरगाव (गिरगाव) तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे ग्रामपंचायत मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामफलक लावण्याचा ठराव करण्यात आला होता,सदर ठराव ग्रामपंचायत बैठक मध्ये विषय मांडून तो सर्वानुमते पारित करून घेण्यात आल्याचे व्हिडिओ मधिल व्यक्तीने म्हटल्याचे दिसते,यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामफलक नवरगाव बसस्थानकात रीतसर अनावरण करत लावण्यात आला होता,मात्र गावाचे सरपंच आणि इतर काहींनी जातीयवादीवृत्ती मानसिकतेतून सदर फलक 20 डिसेंबर रोजी पोलिसांच्या उपस्थितीत काढून घेण्यात आला,सदर प्रकरणी वाद सुरू असून प्रकरण न्याय प्रविष्ट असताना अशी घटना घडल्याने याचा निषेध म्हणून स्थानिक बौद्ध समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या,तसेच निषेध मोर्चा काढला.याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने स्थानिक बौद्ध समाजाने गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
मौजे नवरगाव (गिरगाव) ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध करत 21 डिसेंबर 2023 रोजी गाव सोडण्याचा निर्णय घेत गाव सोडले आहे.
गेल्या दीड वर्षापासून सदर फलक प्रकरणी वाद सुरू असून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करावी
अशी मागणी स्थानिक बौद्ध ग्रामस्थानी केली आहे. याअगोदरही ग्रामस्थांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी प्रशासाने यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते,मात्र पुन्हा गावात तणाव निर्माण झाल्याने.ज्या गावात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावण्याचा अधिकार नाही अशा गावात राहायचे कशाला? असा रोकडा सवाल उपस्थित करत संतप्त ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलाबाळांसह वयोवृद्ध लोकांसह गाव सोडले आहे.
अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 100 पटीने वाढ
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 24,2023 | 14:45 PM
WebTitle – The Buddhist community of Navargaon Gadchiroli left the village