परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या मृत्यूच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आता एबीपी माझाच्या हाती लागला असून, परभणी जिल्ह्यातील नवामोंदा पोलीस ठाण्यातील मारहाणीचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांचा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. आयोगाने या अहवालाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण गरम झाले आहे. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातूनही समोर आले आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी सरकारची मदत नको, पण दोषींवर कठोर कारवाई हवी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनीही दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने केली आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातील धक्कादायक माहिती
परभणीतील हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. यानंतर, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. घटना घडल्यानंतर जवळपास सुमारे दोन महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली होती. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने, यात पोलिसांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य मानवाधिकार आयोगासमोर 451 पानांचा गोपनीय अहवाल सादर करण्यात आला
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
राज्य मानवाधिकार आयोगासमोर 451 पानांचा गोपनीय अहवाल सादर करण्यात आला आहे.
आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली,” असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. राज्य मानवाधिकार आयोगासमोर 451 पानांचा गोपनीय अहवाल सादर करण्यात आला आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 21,2024 | 13:00 PM
WebTitle – somnath-suryavanshi-death-police-custody-parbhani-maharashtra