30 जानेवारी 2025 | नवीदिल्ली : “काँग्रेस ने दलित-ओबीसींचा विश्वास टिकवला असता, तर आरएसएस सत्तेत आलंच नसतं” – राहुल गांधी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पक्षाच्याच विरोधात तीखट टीका केली. दलित, पिछडे आणि ओबीसी वर्गाच्या प्रतिनिधित्वावर बोलताना त्यांनी म्हटलं, “काँग्रेसने या वर्गांचा विश्वास राखला असता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कधीच सत्तेवर आला नसता.” दलित इंटेलेक्च्यूल प्रतिभावंतांच्यासोबत संवाद साधताना राहुल यांनी पक्षातही ‘आंतरिक क्रांती’ची गरज असल्याचे म्हटले आणि वंचित समुदायांना संघटनेत योग्य स्थान देण्याचे आश्वासन दिले.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित समाज दशा व दिशा या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते.

इंदिरा गांधीच्या काळात होता विश्वास, पण १९९० नंतर झाला घट
राहुल यांनी कबुली दिली की, “१९९० च्या दशकापासून काँग्रेस दलित,ओबीसींचा आणि अतिमागासांच्या हितसंबंधांचं योग्य रक्षण करू शकली नाही. इंदिरा गांधीजींच्या कारकिर्दीत या वर्गांना पूर्ण विश्वास होता. त्या त्यांच्यासाठी लढतात, हे सर्वांना माहिती होतं. पण १९९० नंतर हा विश्वास कमी झाला. ही वास्तवता काँग्रेसने मान्य केली पाहिजे.” त्यांनी भर देत सांगितलं, “आमच्या चुकांमुळे आरएसएसला वाट मिळाली. हे बोलणं मला राजकीयदृष्ट्या नुकसानदेखील पोहोचवेल, पण सत्य सांगणं गरजेचं आहे.”
“काँग्रेसमध्ये आंतरिक क्रांती आणणार”
लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल यांनी दलित समुदायाला संबोधित करताना स्पष्ट केलं, “काँग्रेसमध्ये प्रथम आंतरिक बदल घडवून आणावे लागतील. संघटनेत दलित, आदिवासी, अतिमागासांना प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे.” त्यांनी शिक्षणव्यवस्थेकडे बोट दाखवत म्हटलं, “भारतातील शिक्षणयंत्रणा कधीच दलित-अतिमागासांच्या हातात नव्हती. भाजपा-आरएसएसनी संपूर्ण व्यवस्था काबीज केली आहे, म्हणून या समस्यांचे निराकरण होणार नाही.”
केजरीवाल आणि मोदीवर दलितविरोधी असल्याचा आरोप
राहुल यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही टिका केली.
ते म्हणाले की, “केजरीवालही नरेंद्र मोदीप्रमाणेच आरक्षणविरोधी आणि दलितविरोधी आहेत. फक्त ते मोदींपेक्षा जरा ‘परिष्कृत’ पद्धतीने वागतात.”
भाजपावर टीका करताना त्यांनी म्हटलं, “भाजपा फक्त फसवणूक करते. हे लोक देश चालवू शकत नाहीत.”
“दुसरा स्वातंत्र्यलढा लढवायचा आहे”
राहुल यांनी भविष्याचा मार्ग दर्शवत सांगितलं, “दलित, आदिवासी आणि ओबीसी वर्गासाठी ‘दुसरे स्वातंत्र्य’ येणार आहे.
यात फक्त राजकीय प्रतिनिधित्वासाठी नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्र आणि संस्थांमध्ये हिस्सेदारी मिळवणं गरजेचं आहे.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, हा नवा लढा समाजाच्या मूलभूत ढांच्यात बदल घडवून आणेल.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 30,2024 | 21:00 PM
WebTitle – rahul-gandhi-criticizes-congress-rss-dalit-obc-representation
#RahulGandhi #Congress #DalitRights #OBC #RSS #AAP #Modi #Kejriwal