नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील एका गावात बजरंग दल च्या सदस्यांचा समावेश असलेल्या जमावाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आणि दलित समाजातील लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी गुरुवारी तिघांना अटक करण्यात आलीय.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या महिन्याच्या सुरुवातीला बरखेडा कुर्मी गावात मंगळवारी एक घटना घडली,एका धार्मिक मिरवणुकीत एका मद्यधुंद गावकऱ्याने एका पुजाऱ्यावर हल्ला केला आणि हनुमानाच्या ध्वजाचे नुकसान केले.मंगळवारी जमावाने या व्यक्तीच्या घराची तोडफोड करून त्यावर भगवा झेंडा लावला.
इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृतानुसार,पोलिसांनी सांगितले की, मिरवणुकीत सामील असलेल्या पाच जणांची, ज्यांची एफआयआरमध्ये नावे आहेत, त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. गावातील रहिवाशांनी विरोध केल्यावर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आणि जातीवाचक शिवीगाळ देखील केली.पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसीच्या अनेक कलमान्वये तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली इछावर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.
रॅलीची परवानगी घेतली नव्हती
इछावर पोलिस ठाण्याच्या प्रभारी उषा मारावी यांनी सांगितले की,
“आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. यात बजरंग दल चे सदस्य होते, यातील बहुतांश लोक आसपासच्या गावातील होते. आठ दिवसांपूर्वी एका धार्मिक मिरवणुकीत हाणामारी झाली होती. मद्यधुंद अवस्थेत एका गावकऱ्याने हनुमान ध्वज घेऊन जाणाऱ्या पुजाऱ्यावर काठीने हल्ला केला होता. ध्वजावर हनुमानाचे चित्र होते, जे या हल्ल्यात खराब झाले. त्यामुळेच ही घटना घडली आहे. आपल्या रॅलीला गावात येऊ दिले जाणार नाही, असे रॅली काढणाऱ्याना वाटल्याने या रॅली मध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यांनी आमच्याकडून परवानगी घेतली नव्हती.”
घटनेमागे पूर्वग्रह दूषित मानसिकता,अगोदरही पुतळ्यावर आक्षेप होता
स्थानिक दलित हक्क संघटना – भीम युवा संघटना – च्या सदस्यांनी गुरुवारी आंबेडकर पुतळ्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले,
त्यावेळी पुतळ्याच्या गळ्याभोवतीच्या भागात तडे गेले असल्याचे दिसून आले.हा पुतळा एप्रिलमध्ये बनवण्यात आला होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय राठोड याने पुतळ्याच्या बांधकामावर आक्षेप घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये बजरंग दलाचा सदस्य असलेल्या अजय राठोड चाही समावेश आहे.
यावरून हे स्पष्ट होतं की या घटनेमागे अजय राठोड याची पूर्वग्रह दूषित जातीयवादी मानसिकता आहे,
त्याचा अगोदरही पुतळ्यावर आक्षेप होता,त्याने आता तो राग काढला.
भीम युवा संघटनेच्या एका सदस्याने सांगितले की,
“आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून आणि गावाच्या वेशीवर आंबेडकरांचा ध्वज लावण्यावरून मारामारी झाली.
ग्रामपंचायतीने पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही सर्वांच्या परवानगीने हे केले, पण त्यामुळे तणाव वाढला आहे.“
आरएसएस ने केले हात वर
दुसरीकडे स्थानिक आरएसएस सदस्य धीरज पाटीदार म्हणाला, “या घटनेत अजय राठोड आणि इतर बरेच लोक बजरंग दल चे होते.या गावात कोणताही वाद नव्हता.जेव्हा ते डीजे वाजवत मिरवणुक घेऊन आले आणि त्यांनी मूर्तीची विटंबना सुरू केली तेव्हा मी त्यांना विरोध केला आणि जमावाशी भिडलो.या घटनेत सहभाग असलेले बहुतांश बाहेरच्या गावातले लोक होते. आमच्या मनात डॉ.आंबेडकरांच्या विरोधात काहीही नाही.”
हनुमान प्रतिमा अन ध्वजाची विटंबना केल्याप्रकरणी वेगळ्या एफआयआर अंतर्गत अटक करण्यात आलेल्या
कन्हैया लाल च्या घरावर जमावाचे सदस्य चढले आणि छताचे नुकसान केले. कन्हैया लाल चे वडील दुर्गा प्रसाद म्हणाले,
“त्यांनी घरावर भगवा ध्वज लावला आणि छताचे नुकसान करून ते निघून गेले. घटनेच्या वेळी माझा मुलगा दारूच्या नशेत होता.
त्यांनी माझ्या घरावर हल्ला करायला नको होता.”
जागल्याभारत टेक
देशात अलिकडे रॅली काढून वातावरण दूषित करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत,जर तुम्ही हरयाणा नूह मध्ये जे घडलं ते अभ्यासलं तर लक्षात येईल की संवेदनशील भागात जाणूनबूझून अशा रॅलीज आयोजित केल्या जातात,डिजे वाजवला जातो आणि आसपासच्या गावातले लोक जमा केले जातात,जेणेकरून गावातील स्थानिक लोक त्यांना ओळखू नयेत, त्यांच्यातलाच एकजण दगड मारतो,असे व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत.
हा पॅटर्न जबाबदार सरकार आणि पोलिस प्रशासनाने हाणून पाडणे गरजेचे आहे.जस जशा निवडणुका जवळ येत आहे,प्रत्येक समाजा घटकांच्या संबंधित महापुरुष श्रद्धास्थान प्रतिमा प्रतीके यांची विटंबना जाणीवपूर्वक केली जाईल आणि ध्रुवीकरण करून राजकीय पोळ्या भाजल्या जातील. त्यामुळे सर्वधर्मीय सामान्य नागरिकांनी अशा गोष्टीत भाग घेऊ नये.शांत राहावे.कुणी विटंबना केल्याने कुणाची किंमत कमी होत नाही.सूर्यावर काजव्यानी जातीय द्वेषातून गरळ ओकली तरी ती त्यांचेच थोबाड रंगवत असते,हे कधीही विसरू नका.बाकी ही बातमी तुम्हाला मेनस्ट्रीम मिडियात कुठेही सापडणार नाही.
मणिपूर ते नूह सारख्या घटनांमुळे देशाला सिव्हिल वॉर चा धोका
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 04,2023 | 19:12 PM
WebTitle – mp Bajrang Dal members vandalized the statue of Dr. Babasaheb Ambedkar, attacked Dalits: Police