आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी चे आंदोलन सुरू आहे.जंतरमंतरवर जेनझी ची हजारोच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.संस्थापक अभिजीत दिपके आज दिल्लीत स्वत: मैदानात उतरला आहे. सोशल मीडियातून सुरू झालेली चळवळ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आहे.ही एक चांगली गोष्ट आहे.

कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजीत यांचा जन्म आंबेडकरी घरातला आहे,त्याने त्याची ओळख कधीही लपवली नाही.त्याने उघडपणे आपले विचार मांडले,जयभीम हा क्रांतीकारी नारा दिला.त्याने एका पोस्टमध्ये मी दलित आहे असे म्हटल्यावर ब्राह्मण अनुराधा तिवारी या ट्रोलरने त्याला ट्रोल केले होते.आणि जेन झी चा लीडर दलित आहे,(म्हणजे) तो मेरिट विरोधी आहे.विकास विरोधी आहे.अशी पाचकळ बकवास थिअरी मांडली होती.
कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानचे सर्वात जास्त फॉलोअर्स असण्याचा फालतू आणि खोटा नॅरेटीव्ह मनुवादी सुपीक डोक्यातून कुजबूज मोहिमेद्वारे पसरवला गेला. विदेशी धर्ती,विदेशी फंडिंग असे अभिजीतला अनेक पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न मनुवादी शक्तीकडून झाला.
So this self-proclaimed Gen Z leader is against Merit.
— Anuradha Tiwari (@talk2anuradha) May 21, 2026
Anybody who supports ZERO marks cut-offs for admissions is downright anti-progress ! https://t.co/iMNetVg26u
मात्र अभिजीत आज एअरपोर्टवर उतरला.हातात बाबासाहेबांचा कव्हर फोटो असणारे पुस्तक मिरवत सामोरे गेला.
Abhijit Dipke left from Airport and going straight to Jantar Mantar.#DharmendraPradhan #EducationMinister #ResignDharmendraPradhan #DelhiAirport #JantarMantar #AbhijeetDipke #CockroachJanataParty #CJP #StudentVoice #EducationReform #SaveEducation #Democracy #Constitution… pic.twitter.com/fn7dTFc8SA
— Milind Dhumale (@MilindDhumale) June 6, 2026
यानंतर आंदोलनात देखिल सातत्याने जयभीम चे नारे गाजत राहिले.नेहा शर्मा जेएनयू दिल्लीची विद्यार्थी नेता आहे.
ती सुद्धा ब्राह्मण आहे परंतु तिचे विचार प्रगतिशील आहेत,मनुस्मृती आणि स्त्रियांच्या बद्दल आरक्षण दलितांच्या बद्दल तिचे थॉट क्लियर आहेत.
तिचा व्हिडिओ मी फेसबुकवर शेअर केला आहे.ती जोरदार जयभीमचा नारा देते.
आज कॉकरोच जनता पार्टी च्या दिल्ली जंतरमंतरवरील आंदोलनात जेनझी ची हजारोच्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
कॉकरोच जनता पार्टी चा संस्थापक अभिजीत आंबेडकरी आहे.याबद्दल देशातील तरुण वर्गाला कोणताही फरक पडलेला नाही.
सर्व धर्मीय सर्व जातीय तरुण अभिजीतला आपला लीडर मानत आहेत,नेता मानत आहेत.
आणि जयभीमचा उद्घोष करत आहेत.हे चित्र मला खूप महत्वाचे वाटते.
“जयभीम” हा केवळ एका समाजाचा किंवा एका चळवळीचा नारा राहिलेला नाही
आम्हाला न्याय देणारा नेता हवा आहे,हा तरुणांचा मुद्दा आहे.त्यांना त्याच्या जाती धर्माशी देणेघेणे नाही.
मी अशा सूक्ष्म गोष्टी जास्त बघत असतो,जे अनेकांना पाहता येत नाही,माझे विश्लेषण नेहमी वेगळे असते,काही लोकांना त्यात तर्क लावता येत नाही.ते आपल्या बुद्धीच्या मर्यादेप्रमाणे तर्क लावून आपल्या सबकॉन्शसमाइंड मध्ये रुजलेल्या प्रतिमेला अनुसरून अगोदरच आपल्याला आवडणारा निष्कर्ष काढून मोकळे होतात,नंतर तोंडावर आपटतात.असो.
माझ्या मते, या आंदोलनातून एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बाब समोर आली आहे.
“जयभीम” हा केवळ एका समाजाचा किंवा एका चळवळीचा नारा राहिलेला नाही,
तर तो हळूहळू संविधान, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यापक जनसमूहाचा नारा बनत आहे.
तो अधिक सर्वसमावेशक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली संविधानिक मूल्ये, समानता, बंधुता आणि न्याय यांची संकल्पना आज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे.
समाजातील विविध घटकांना हे जाणवू लागले आहे की,
संविधान आणि त्यामागील आंबेडकरी विचार हेच प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे सर्वात मोठे संरक्षण आहे.
यामध्ये सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अनेक दशकांपासून डॉ. आंबेडकरांचे विचार मर्यादित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा व्यापक प्रसार होऊ नये यासाठी विविध पातळ्यांवर दुर्लक्ष करण्यात आले, अशी भावना अनेकांची आहे. मात्र सोशल मीडियामुळे माहितीवरील मक्तेदारी तुटली आणि नवीन पिढीने स्वतः वाचून, शोधून आणि समजून घेण्यास सुरुवात केली.
अर्थात, हे परिवर्तन केवळ एका आंदोलनामुळे घडलेले नाही. दिल्लीसह देशभरात विविध प्रश्नांवर होणाऱ्या अनेक आंदोलनांमध्ये आज हाताच्या मुठी आवळून दिला जाणारा “जयभीम”चा नारा ऐकू येतो.जसा तो शाहीन बाग मध्ये दिसला तसा शेतकरी आंदोलनात देखिल दिसला.संविधान वाचविण्याच्या, लोकशाहीचे संरक्षण करण्याच्या आणि नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्याच्या शपथा घेतल्या जातात. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि चळवळी देखील संविधानाचा आधार घेताना दिसतात. कारण अखेर संविधान हेच असे माध्यम आहे जे प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य, अधिकार आणि सन्मान जपण्याची हमी देते.
या आंदोलनातून पुढे नेमके काय घडेल, याचे उत्तर आज कोणाकडेही नाही.ही ऊर्जा दीर्घकालीन चळवळीत रूपांतरित होईल का,
लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का, नवीन नेतृत्व उभे राहील का,
की हा उत्साह कालांतराने कमी होईल, हे येणारा काळच ठरवेल.तूर्तास या मुद्यांना बाजूला ठेवू.
परंतु या सर्व प्रश्नांपलीकडे एक गोष्ट निश्चितपणे दिसून येते.संविधान, सामाजिक न्याय
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबाबत समाजात नव्याने जागरूकता निर्माण होत आहे.
आणि कोणत्याही लोकशाही समाजासाठी ही बाब निश्चितच सकारात्मक आणि आशादायी मानली पाहिजे.

Milind Dhumale
Editor and political–social affairs analyst with a sharp focus on constitutional values, social justice, and power structures in contemporary India. His writing examines caste, governance, law, and public policy through a fact-based, critical lens, aiming to challenge dominant narratives and highlight voices often pushed to the margins. Known for clarity, depth, and editorial rigor, he brings analytical precision to issues that shape democracy and social equity.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 06,2026 | 15:55 PM
WebTitle – Jaibhim Beyond Caste Towards Social Justice























































