प्रसिद्ध अभिनेते पियुष मिश्रा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो कम्युनिस्टांच्या तावडीत कसा अडकला आणि आपले आयुष्य कसे बरबाद केले याचा खुलासा केला.पीयूष मिश्रा म्हणतात की कम्युनिस्टांमुळे त्यांच्या आयुष्यातील 20 वर्षे बरबाद झाली. त्याना आई-वडिलांसह सर्व काही सोडले होते.लक्षात घेतलं पाहिजे की पीयूष मिश्रा हे स्वत: कम्युनिस्ट राहिले आहेत.अभिनय जगताशी त्यांचा संबंध नव्हता त्यावेळचा हा काळ होता.पीयूष मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कम्युनिस्ट म्हणायचे की आई-वडील घाणेरडी गोष्ट (मां-बाप गंदी चीज है) आहे. ऑफ-बीट चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पीयूष मिश्रा च्या या खुलाशाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
पियुष मिश्राने नुकतीच ‘द ललनटॉप’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यानी त्यांच्या वाईट काळातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
त्यांनी म्हटलं की, फिल्मी दुनियेत येण्याआधी त्यांनी वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली,ज्यामुळे त्यांचे आयुष्य बरबाद झालं,एवढच नाहीतर त्यांनी आपलं कुटुंब आणि पत्नी देखील सोडली होती. पियुष मिश्राच्या शब्दात सांगायचे तर, “कॉम्रेड लोकांनीच माझी ऐसी तैशी केली”
‘कम्युनिस्टांच्या दबावाखाली, 20 वर्षे बरबाद झाली’
आपल्या वाईट काळाबद्दल सविस्तर बोलताना पीयूष मिश्रा म्हणाले, ‘कॉम्रेड लोकांनीच माझी ऐसी तैशी केली. तोच काळ होता जेव्हा मी कम्युनिस्टांच्या दबावाखाली होतो. कम्युनिस्टांनी माझ्या आयुष्यातील 20 वर्षे उध्वस्त केली.कुटुंब ही घाणेरडी गोष्ट आहे, आई घाणेरडी गोष्ट आहे, बाप ही घाणेरडी गोष्ट आहे, असे ते म्हणायचे. समाजासाठी काम करावे लागेल. मग माझा प्रश्न होता की ते समाजाचा भाग नाहीत का? तेही समाजाचाच एक भाग आहेत. पण यावर ते म्हणत की नाही,ते समाजाचे घटक वेगळे असतात. हे काही वेगळेच आहे. समाज काही औरच आहे. कुठून तरी क्रांती होईल. लाल बत्तीत क्रांती अडकली आहे. थांबली आहे.एक दिवस तुम्हाला दिसेल की आता क्रांती धावून येईल.
आई-वडील आणि बायकोलाही सोडले
पीयूष मिश्रा पुढे म्हणाले, ‘त्यांनी मला सलग 20 वर्षे काम करायला भाग पाडलं. ते म्हणायचे की जो पैसा कमावतो तो भांडवलदार होतो.
म्हणूनच कधीही पैसे कमवू नको. मी म्हणालो की मी कमावणार नाही.
मी सर्व काही सोडले आयुष्यात मी माझे आई-वडील, पत्नी आणि इतर सर्वांना सोडले.
जेव्हा मला जाणीव झाली की मी एक वाईट बाप झालो आहे…
मी एक वाईट मुलगा असल्याचे सिद्ध केले आहे, तेव्हा मला वाटले की मी वाईट बाप सिद्ध होणार नाही.
मला एक मोठा मुलगा आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की पियुष मिश्रा चुकत आहे.
या लोकांनी तुमच्याकडून सर्व काही घेतले आहे. आणि खरोखरच त्यांनी सर्वकाही घेतले होते.
कुटुंबाची काही काळजी नव्हती.. कुटुंबाला विसरून जा. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी त्यात घाला.
पीयूष वाईटरित्या मोडला, चित्रपटांचा निर्णय घेतला
पियुष मिश्रा इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की कम्युनिस्ट कनिष्ठांकडून खूप वाईट काम करून घेतात.
कम्युनिस्टांसाठी काम केल्याने तो वाईटरित्या खचून गेल्याचे पीयूष मिश्रा यांनी सांगितले.
त्यांची प्रकृती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खालावली होती.
मग पियुष मिश्रा यांनी एक दिवस ठरवले की त्यांना सिनेमाच्या दुनियेत जायचे आहे.
The Kerala Story द केरळा स्टोरी चित्रपटावर सरकारची बंदी!
आई कर्ज फेडू शकली नाही; 30 वर्षीय व्यक्तीने 11 वर्षाच्या मुलीशी लग्न
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 09,2023 19:45 PM
WebTitle – Communists ruined 20 years of my life Piyush Mishra