भाजपाने मंगळवारी ‘सौगात-ए-मोदी’ मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत देशभरातील 32 लाख गरजू मुस्लिम समुदायाला ईद साजरी करण्यासाठी विशेष किट वाटल्या जात आहेत. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्च्याने या मोहिमेची जबाबदारी स्वीकारली आहे.

देशातील 32 हजार मशिदींमध्ये भाजपाचे 32 हजार कार्यकर्ते काम करत आहेत. प्रत्येक मशिदीतून 100 जणांना मदत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या किटमध्ये कपडे आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे. स्त्रियांसाठी सूट, पुरुषांसाठी कुर्ता-पायजामा, डाळ, तांदूळ, सेवई, सरसों तेल, साखर, कपडे, मेवा, खजूर अशा वस्तू या किटमध्ये दिल्या जात आहेत. प्रत्येक किटची किंमत साधारण 500 ते 600 रुपये इतकी आहे.
भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक सण आनंदाने साजरा करतात. आम्ही प्रत्येक सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. आज आम्ही ‘सौगात-ए-मोदी’ किट वाटत आहोत कारण हा रमजान महिना आहे. प्रत्येकाच्या आस्थेचा आदर केला पाहिजे.”
भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया
अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी यासिर जिलानी म्हणाले, “ही मोहीम भाजपच्या मुस्लिम समुदायातील कल्याणकारी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. याद्वारे भाजप आणि एनडीएला राजकीय पाठिंबा मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.”
दिल्ली हज कमिटीच्या अध्यक्षा कौसर जहान म्हणाल्या, “प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे एक उत्तम पाऊल आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीला भेदभाव न करता साथ दिली आहे. ‘सर्वांचा साथ, सर्वांचा विकास’ हाच आमचा मूलमंत्र आहे.”
केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, “माझे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘सर्वांचा साथ, सर्वांचा विकास’ यावर विश्वास ठेवतात.
याच विचारसरणीसह केंद्र सरकार आणि बिहार सरकार विकासाच्या दिशेने काम करत आहे.”
विरोधकांची प्रतिक्रिया
अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी खोचक टिका करत म्हटले की , “हे राजकारण आहे की हृदयपरिवर्तन? हे कसे प्रेम आहे?
ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो आणि आता तरी ते संविधान स्वीकारतील. त्यांनी द्वेषाच्या राजकारणापासून दूर रहावे.”
काँग्रेस सांसद रंजीत रंजन म्हणाले, “बिहारमध्ये निवडणूक आहे, ते ‘सौगात’ किट देत नाहीत तर मतं मागत आहेत.
जर त्यांना बिहारमध्ये ‘सौगात’ द्यायची होती, तर त्यांनी बिहारमधील पलायन थांबवण्यासाठी नोकऱ्या दिल्या पाहिजेत होत्या.”
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “भाजपने प्रत्येक सण साजरा केला पाहिजे. समाजवादी पक्षाचे नेहमीच मत आहे की सर्व सण साजरे केले पाहिजेत. भाजपा आता मोठ्या प्रमाणात सण साजरे करत आहे हे आनंदाचे आहे. भाजपा हा एक मतासाठी काहीही करू शकणारा पक्ष आहे.”
काँग्रेस सांसद इमरान मसूद म्हणाले, “जर प्रधानमंत्री मोदी यांचे हे विचार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो,
पण देशात सुमारे 25 कोटी मुस्लिम आहेत आणि 95% मुस्लिम गरीब आहेत.
पंतप्रधानांनी त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. मुस्लिमांसाठी शिक्षण, रोजगाराची हमी दिली पाहिजे.”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 26,2024 | 10:48 AM
WebTitle – bjp-eid-initiative-saugat e modi-gift-special-kits-muslims