प्रेम हा शब्द ऐकल्यावर मनात रोमँटिक चित्रे उमटतात, पण ठाणेकर अरविंद बर्डे यांनी या शब्दाला एक नवीनच अर्थ दिला आहे. त्यांनी बांगलादेशी महिलेशी प्रेमात पडून तिला भारतीय बनवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ रचला. आणि हे सगळं कसं? तर तिला ‘अंजली राजाराम पाटील’ हे नाव देऊन! भारतीय प्रशासनाला कसे मूर्ख बनवता येते,आणि अधिकारी कशाप्रकारे गरिबांना नाडतात आणि अशा लोकांना भरभरून साथ देतात हे अरविंद ने सिद्ध करून दाखवलं.खऱ्या मूळ निवासी लोकांना जातीच्या प्रमाणपत्रासाठी दे माय धरणी ठाय करत सात पिढ्यांची माहिती मागवून भंडावून सोडले जाते,तर दुसरीकडे अशी अलौकिक गंमत सुद्धा दिसून येते.

अरविंद बर्डे प्रशासनाला मूर्ख बनवणारा कागदपत्रांचा जादूगार
अरविंद बर्डे याची २००० साली बांगलादेशी महिलेशी ओळख झाली. प्रेमात पडल्यानंतर त्यानी तिला भारतीय बनवण्याचा प्लॅन आखला. पहिली पायरी म्हणून अरविन्दने तिला पश्चिम बंगालमधील शाळेचे आणि ग्रामपंचायतीचे दाखले मिळवून दिले. आणि हे सगळं करताना तिला ‘अंजली राजाराम पाटील’ हे नाव दिलं. नाव बदलून कागदपत्रं बनवणं हा त्यांचा पहिला गेम प्लान यशस्वी ठरला होता.
पुढे त्याने तिच्याशी लग्न केलं आणि तिचं नाव ‘अंजली बर्डे’ असं ठेवलं. इतकच नाहीतर त्यानंतर त्याने तिच्या तीन मुलांसाठीही बनावट कागदपत्रं तयार केली.
या कुटुंबाला अंबरनाथ येथे बेकायदा वास्तव्यासाठी मदत केली. अरविंद याच्या या कृतीतून तो एकतर ‘कागदपत्रांच्या जादूगार’ असल्याचं सिद्ध झालं.किंवा त्याने व्यवस्थितपणे भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना मूर्ख बनवले आहे.तिसरी शक्यता आणि अर्थातच जास्त हीच असू शकते की प्रत्येक टेबलावर “वजन” ठेवत हा पराक्रम झालेला आहे.असेही आजही सामान्य नागरिकांना अशा गोष्टींचा अनुभव येतच असतो.नाहीतर काम होतच नाही.
रिया बर्डेला अटक झाली अन प्रकरणाचा झाला पर्दाफाश
या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तो रिया बर्डे या अंजलीच्या मुलीच्या अटकेनंतर. रिया, जी मूळची बांगलादेशी आहे, तिने अश्लील फोटो पाठवून काही भारतीय मुलांना ब्लॅकमेलिंग केल्याच्या आरोपात सप्टेंबर २०२४ मध्ये अटक झाली. तिच्या चौकशीदरम्यान अंजली, तिची बहीण रितू आणि भाऊ रवींद्र यांच्यासह बांगलादेशातून बेकायदा भारतात आल्याचं उघडकीस आलं.
अरविंदची कागदपत्रांची कला
अरविंद याने अंजलीला पश्चिम बंगालची कागदपत्रं तयार करून दिली. त्यानंतर त्याने तिला अमरावतीच्या अचलपूर येथून जातीचे दाखले, इतकच नाही तर जात पडताळणी प्रमाणपत्र आणि नागपूर रिजनकडून चक्क पासपोर्टही मिळवून दिला. त्याच्या तीन मुलांना नवी मुंबईच्या नेरूळमधील एका शाळेत प्रवेशही मिळवून दिला.अरविंद यांच्या या कागदपत्रांच्या कलेमुळेच हे सगळं शक्य झालं.
अरविंद आणि अंजलीचा पलायनाचा अयशस्वी प्रयत्न
रिया बर्डेच्या अटकेनंतर अरविंद आणि अंजली यांनी कतार देशात पलायन केलं. पण त्यांच्या या खेळाचा शेवट झाला तो मुंबई विमानतळावर.
३१ जानेवारी रोजी नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना अरविंदला ठाणे पोलिसांनी अटक केली.
त्याच्या विरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती.
प्रेमाच्या नावाखाली देशाशी गद्दारी करत बनावट कागदपत्रं तयार करण्याची ही कहाणी खरोखरच गमतीशीर आहे.
पण त्याच्या या खेळाचा शेवट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांना आता या कागदपत्रांच्या खेळाची किंमत मोजावी लागणार आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 13,2024 | 13:24 PM
WebTitle – arvind-barde-fake-documents-scam-bangladeshi-wife-thane-police