अक्षय कुमार ने अखेर भारतीय नागरिकत्व मिळवले आहे. याबाबतची माहिती खुद्द अक्षय कुमार ने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अक्षय कुमार ने ट्विटरवर त्याच्या अधिकृत सरकारी कागदपत्रांचे छायाचित्र शेअर करून भारताचा नागरिक असल्याचा पुरावा दिला आहे. वाचकांच्या माहितीसाठी, यापूर्वी अक्षय कुमारकडे कॅनडा चे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले होते.आणि त्या त्या वेळी अक्षय कुमार ने यावर बोलणे नापसंत केले किंवा असं काही नसल्याचा दावा केला होता,मात्र आता त्याने अधिकृतपणे भारताचं नागरिकत्व स्विकारलं आहे.
अक्षयचे भक्त म्हणाले – आता टीका करणाऱ्या लोकांचे बोलणे बंद
अक्षय कुमारने लिहिले, ‘मन आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!’
अक्षयच्या या घोषणेनंतर काही लोक त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याचबरोबर काही जणटिकेल प्रत्युत्तर देत आहेत.
अक्षयच्या पोस्टवर कमेंट करताना एका अक्षय फॅन ने लिहिले की,’अक्की पाजी अभिनंदन! तुम्ही आधी भारतीय होता, आताही भारतीय आहात आणि कायम भारतीयच राहाल.’ आणखी एका युजरने लिहिले, ‘घर वापसीच्या शुभेच्छा’. तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ट्रोल्सना आता बोलणे बंद करू द्या.’
एक ट्विटर युजर डॉ.नीरव मोदी पॅरोडी अकाऊंट म्हणाले “भारतीय झाल्याबद्दल अभिनंदन, शक्य असल्यास, कॅनडाला मनातून काढून टाका.”
2019 मध्ये अर्ज केला
2019 मध्ये, अक्षय कुमारने हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटच्या एका सत्रात वचन दिले होते की
तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करेल. तीन वर्षांनंतर अपडेट देत म्हणाला
“कॅनडियन पासपोर्ट असण्याचा अर्थ मी भारतीयापेक्षा कमी नाही. मी पूर्णपणे भारतीय आहे. होय, मी हे 2019 मध्ये सांगितले होते की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पण नंतर महामारी आली. मात्र, आता लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन माझा पासपोर्ट येईल. मी काय करू, मी थोडी महामारी आणली आहे.” तर आता 2024 मध्ये त्याचा पासपोर्ट आला आहे.
5 वर्षात 8 लाख नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले, चीन-पाकिस्तानाचीही निवड ; जाणून घ्या काय कारण आहे
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 15,2023 | 14:54 PM
WebTitle – Akshay Kumar got Indian citizenship