अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षात अभूतपूर्व अंतर्गत वाद उफाळून आला असून, या राजकीय धक्क्याचे पडसाद थेट राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचले आहेत. मागील निवडणुकीत तब्बल ४५ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला यंदा केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पराभवामागील जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आता भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. यामुळे अमरावती भाजपमधील अंतर्गत कलह पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे.
अमरावती भाजप मध्ये उघड बंडखोरी; २२ पराभूत उमेदवारांचा नवनीत राणा विरोधात एल्गार
मुख्यमंत्र्यांकडे नवनीत राणा यांची थेट हकालपट्टीची मागणी अमरावती मधिल भाजप च्या २२ पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.
पाठवलेल्या पत्रात नवनीत राणा यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप करण्यात आले आहेत. “आमचा पराभव विरोधी पक्षांमुळे झाला नाही, तर भाजपच्याच नेत्या नवनीत राणा यांच्या नियोजित भूमिकेमुळे झाला,” असा स्पष्ट आरोप पत्रात करण्यात आला आहे. आम्ही वर्षानुवर्षे भाजपसाठी काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते असूनही, निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर आम्हाला पक्षातूनच धोका देण्यात आला, असा दावा या उमेदवारांनी केला आहे.
पत्रानुसार, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना डावलून आपल्या ‘युवा स्वाभिमान’ संघटनेच्या उमेदवारांचा उघडपणे प्रचार केला. इतकेच नव्हे तर भाजपचे अधिकृत उमेदवार हे केवळ ‘डमी’ असल्याचा प्रचार केल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट फटका भाजप पॅनेलला बसला, असा आरोप या पत्रात नमूद करण्यात आला आहे.
या पराभवामागे नियोजित कट रचल्याचा दावाही या उमेदवारांनी केला आहे. पत्रात म्हटले आहे की, भाजपचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये नवनीत राणा यांनी जाणीवपूर्वक आपले उमेदवार उभे केले. यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांची मते फुटली आणि संपूर्ण पॅनेलची रणनीती कोलमडली. यामध्ये शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मदतीने संघटनात्मक फेरफार करून अधिकृत उमेदवारांची पीछेहाट घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
“जर पक्षश्रेष्ठींनी वेळीच हस्तक्षेप करून नवनीत राणा यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला नाही,
तर त्या भविष्यात अमरावतीत भाजपचा पूर्ण नायनाट करतील,” असा इशारा या २२ पराभूत उमेदवारांनी आपल्या पत्रातून दिला आहे.
त्यामुळे हा वाद केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्य पातळीवरील पक्ष नेतृत्वासाठीही डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, या गंभीर आरोपांवर नवनीत राणा यांनीही स्पष्ट आणि आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत पराभवाचे खापर आपल्यावर फोडणे चुकीचे असल्याचे सांगितले.
“जनतेने योग्य उमेदवारांनाच निवडून दिले आहे. भाजपमध्ये तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला.
तो झाला नसता, तर भाजप सहजपणे ५० पेक्षा अधिक जागा जिंकू शकला असता,” असा दावा त्यांनी केला आहे.
टीका करणाऱ्या नेत्यांना थेट मंचावर येण्याचे आव्हान देत नवनीत राणा म्हणाल्या की,
राजकारणात पराभव स्वीकारण्याऐवजी दोषारोप करणे सोपे असते. जरी युवा स्वाभिमान संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असली,
तरी भाजपसोबतची आपली मैत्री आणि वैचारिक जवळीक कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
अमरावतीतील या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून,
या प्रकरणावर पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ही केवळ स्थानिक राजकीय कुरघोडी ठरणार की भाजपच्या संघटनात्मक रचनेवर दूरगामी परिणाम करणारी घटना ठरणार,
याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 17,2026 | 23:40 PM
WebTitle – Amravati BJP Faces Internal Revolt as 22 Defeated Candidates Demand Expulsion of Navneet Rana























































