मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आक्रमक झाली असून रामदास आठवले यांनी आपल्या जगप्रसिद्ध अभूतपूर्व अशा कविता सदृश शैलीच्या माध्यमातून मिश्किल शेरेबाजी केली आहे.तसेच योग्य सन्मान आणि न्याय्य जागा वाटप न झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल अशी खंतही व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून,
महायुतीच्या विश्वासार्हतेची आणि सामाजिक समावेशकतेची कसोटी असल्याचे मत आरपीआयकडून व्यक्त करण्यात आले आहे.
महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा घटक सुरुवातीपासून निष्ठेने उभा असून, महायुतीच्या प्रत्येक संघर्षात आणि निवडणुकीत पक्षाने सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सन्मानपूर्वक देण्यात याव्यात, ही आमची स्पष्ट आणि आग्रही मागणी असल्याचे पक्षनेतृत्वाने सांगितले.तसेच यावेळी त्यांनी आपल्या जगप्रसिद्ध अभूतपूर्व अशा कविता सदृश शैलीच्या माध्यमातून मिश्किल शेरेबाजी केली आहे.
आम्ही करणार नाही कोणाची गय
आम्ही करणार नाही कोणाची गय,
कारण महायुतीचा होणार आहे विजय!
मुंबईतून घालवू आम्ही दादागिरी,
आणि करू फक्त विकासाची कारागिरी!
दरेकर साहेबांनी दिलाय शब्दाला मान,
म्हणूनच आरपीआयचा वाढणार आहे शान!
आमचा निर्णय आहे एकदम पक्का,
आता विरोधकांना बसणार आहे जोराचा धक्का
योग्य सन्मान आणि न्याय्य जागा वाटप न झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल-आठवले
प्राथमिक जागा वाटपाच्या चर्चेत आरपीआयला सहभागी करून न घेतल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
ही नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी
मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही आरपीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आरपीआय नेत्यांनी सांगितले की, महायुतीचा विजय निश्चित असून, मुंबईतील दादागिरी संपवून विकासाची कारागिरी करण्याचा निर्धार महायुतीचा आहे. दरेकर साहेबांनी दिलेल्या शब्दाचा मान राखला जाईल आणि त्यामुळेच मुंबईत आरपीआयची ताकद आणि शान वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, योग्य सन्मान आणि न्याय्य जागावाटप न झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. आगामी दिवसांत या मुद्द्यावर महायुतीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.अशा परिस्थितीत स्वतंत्र, प्रामाणिक आणि लोकांच्या बाजूने उभा असलेला मीडिया टिकून राहणे अत्यंत कठीण झाले आहे. म्हणूनच आपला मीडिया मजबूत करणे ही आज काळाची गरज आहे.
जागल्याभारत कोणत्याही कॉर्पोरेट, राजकीय पक्ष किंवा सत्ताकेंद्राच्या दयेवर चालत नाही. आम्ही तुमच्यासाठी ज्ञान, बातम्या आणि वास्तव मांडतो—तेही कोणताही दबाव न घेता.
आरएसएस ज्या पद्धतीने गुरुदक्षिणा स्वीकारतो—ना व्यक्ती, ना नोंदणीकृत संघटना—त्याच धर्तीवर, तुम्हीही जागल्याभारतवर मिळणाऱ्या ज्ञान, बातम्या आणि माहितीच्या मोबदल्यात छोटीशी आर्थिक मदत देऊ शकता.
तुमची मदत ही केवळ आर्थिक पाठबळ नाही,
ती स्वतंत्र विचारांना दिलेली साथ आहे,
ती सामाजिक न्यायासाठी उभे राहण्याची भूमिका आहे,
ती फेक न्यूजविरोधातील लढ्यातील सहभाग आहे.
थोडीशी मदतही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
जागल्याभारतला बळ द्या.
सत्याला बळ द्या.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 29,2025 | 12:12 PM
WebTitle – mumbai-municipal-election-mahayuti-rpi-athawale-demand-16-seats























































