आंतरराष्ट्रीय ऐक्य आणि बहुपक्षीय सहकार्याची आवश्यकता आजपर्यंत कधीच नव्हती एवढी स्पष्टपणे जाणवत असताना, नॉर्वेतील नोबेल समितीने २०२० सालासाठीच्या नोबेल शांतता पारितोषिकासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामची (डब्ल्यूएफपी) निवड केली आहे. उपासमारी दूर करण्याप्रती केलेल्या प्रयत्नांसाठी, संघर्षग्रस्त भागांत शांतता प्रस्थापित करण्याप्रती दिलेल्या योगदानासाठी आणि भूकेचा वापर युद्ध व संघर्षाचे शस्त्र म्हणून करण्याच्या प्रवृत्तीविरोधात दिलेल्या लढ्यासाठी डब्ल्यूएफपीचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान केला जाणार आहे.अन्नसुरक्षेसाठी काम करणारी सर्वांत मोठी संस्था वर्ल्ड फूड प्रोग्राम ही उपासमारी दूर करण्यासाठी तसेच अन्नसुरक्षेला बढावा देण्यासाठी काम करणारी जगातील सर्वांत मोठी मानवतावादी संस्था आहे.
संपूर्ण जगावरील उपासमारीचे संकट
आज जगभरात ६९० दशलक्ष लोक उपासमारीचा सामना करत आहेत. म्हणजेच जगातील प्रत्येकी ११ व्यक्तिंच्यामागे १ व्यक्ती उपाशी आहे, इतकी तीव्र ही समस्या तीव्र व गंभीर आहे.जगापुढे असलेली भूक आणि उपासमाराची समस्या पाहून यूनायटेड नेशन्सच्या अनेक संस्था काम करत आहेत. अनेक देशही त्यांच्या देशात अनेक कल्याणकारी योजना राबवत असून अन्नसुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी विनंती केलेले आर्थिक सहाय्य त्यांना मिळाले नाही, तर संपूर्ण जगावरील उपासमारीचे संकट कोणीही कल्पना केली नसेल एवढे तीव्र स्वरूप धारण करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
कोरोनाविषाणूच्या साथीमुळे जगभरातील उपासमारीच्या बळींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. येमेन, काँगो प्रजासत्ताक, नायजेरिया, दक्षिण सुदान आणि बर्किना फासो यांसारख्या देशांमध्ये हिंसक संघर्ष आणि साथीचे आजार यांमुळे उपासमारीशी झगडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.साथीच्या काळात वर्ल्ड फूड प्रोग्रामने आपल्या प्रयत्नांची तीव्रता वाढवण्याची उत्तम क्षमता जगाला दाखवून दिली आहे. संस्थेने म्हटल्याप्रमाणे, “आपल्याकडे आजारावर लस येत नाही तोपर्यंत ही अनागोंदी निस्तरण्यासाठी सकस अन्नधान्य उपलब्ध करून देणे हे महत्वाचे आहे.
उपासमार निर्मूलनाचा समावेश
फूड प्रोग्राम (WFP) –जागतिक अन्नधान्य कार्यक्रम (वर्ल्ड फूड प्रोग्राम) ही भूकबळी व उपासमारी दूर करण्यासाठी तसेच अन्नसुरक्षेला उत्तेजन देणारी जगातील प्रमुख मानवतावादी संस्था आहे. २०१९ मध्ये डब्ल्यूएफपीने ८८ देशांतील, अन्नाचा तुटवडा आणि उपासमारीने ग्रस्त असलेल्या सुमारे १०० दशलक्ष लोकांना, साहाय्य पुरवले.१९६१ साली वर्ल्ड फूड प्रोग्रामची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजतागायत या संस्थेने आफ्रिका, आशिया खंडातील भूकबळी, उपासमारीचा सामना करणार्या देशांना अन्नधान्य पुरवले आहे. या विशाल खंडात गरजूंपर्यंत अन्न पुरवणे ही अत्यंत कठीण समस्या असतानाही या संस्थेने कधी खेचरांवरून, कधी उंटांवरून किंवा हत्तींवरून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अन्न पुरवठा केला आहे.
२०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये उपासमार निर्मूलनाचा समावेश करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डब्ल्यूएफपी हे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख माध्यम आहे.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मे २०१८ मध्ये रिझोल्युझन २४१७चा सार्वमताने स्वीकार केला. यासाठी झालेल्या प्रक्रियेत वर्ल्ड फूड प्रोग्रामचा सक्रिय सहभाग होता.या ठरावामध्ये प्रथमच संघर्ष व उपासमार यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. अन्नविषयक सहाय्यता सर्व गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याप्रती बांधिलकीची सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आठवण करून दिली.
अन्नसुरक्षा
त्याचप्रमाणे उपासमारीचा वापर युद्धासाठी करण्यावर सुरक्षा परिषदेने टीका केली.वर्ल्ड फूड प्रोग्रामला २०२० चा नोबेल पुरस्कारकाही दिवसांपूर्वी नोबेल समितीने २०२० सालासाठीचा आपल्या आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कारासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामची (डब्ल्यूएफपी) निवड केली आहे. उपासमारी दूर करण्याप्रती केलेल्या प्रयत्नांसाठी, संघर्षग्रस्त भागांत शांतता प्रस्थापित करण्याप्रती दिलेल्या योगदानासाठी आणि भूकेचा वापर युद्ध व संघर्षाचे शस्त्र म्हणून करण्याच्या प्रवृत्तीविरोधात दिलेल्या लढ्यासाठी डब्ल्यूएफपीचा नोबेल समितीने शांतता पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
अन्नसुरक्षा वाढीवर भर देण्याच्या कामात मदत करण्याची नोबेल समितीची इच्छा आहे. यामुळे उपासमारीची समस्या दूर तर होईलच, शिवाय, स्थैर्य व शांततेची संभाव्यता वाढण्यासही मदत होईल, असे समितीचे मत आहे.वर्ल्ड फूड प्रोग्रामने दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियात आद्य स्वरूपाचे प्रकल्प राबवून शांततेच्या प्रयत्नांना मानवतावादी कार्याची जोड देण्यात पुढाकार घेतला आहे.अन्नसुरक्षेचा उपयोग शांतता प्रस्थापित करण्याचे शस्त्र म्हणून करण्यात वर्ल्ड फूड प्रोग्रामची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
वर्ल्ड फूड प्रोग्राम
तोपर्यंत आपण उपासमार शुन्यावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही.अन्नसुरक्षा वाढीवर भर देण्याच्या कामात मदत करण्याची नॉर्वेतील नोबेल समितीची इच्छा आहे. यामुळे उपासमारीची समस्या दूर तर होईलच, शिवाय, स्थैर्य व शांततेची संभाव्यता वाढण्यासही मदत होईल, असे समितीचे मत आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामने दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियात आद्य स्वरूपाचे प्रकल्प राबवून शांततेच्या प्रयत्नांना मानवतावादी कार्याची जोड देण्यात पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मे २०१८ मध्ये रिझोल्युझन २४१७चा सार्वमताने स्वीकार केला. यासाठी झालेल्या प्रक्रियेत वर्ल्ड फूड प्रोग्रामचा सक्रिय सहभाग होता.या ठरावामध्ये प्रथमच संघर्ष व उपासमार यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यात आला आहे.
अन्नविषयक सहाय्यता सर्व गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याप्रती
बांधिलकीची सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आठवण करून दिली.
त्याचप्रमाणे उपासमारीचा वापर युद्धासाठी करण्यावर सुरक्षा परिषदेने टीका केली.
कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपासमारीचा सामना करणाऱ्या
किंवा तो धोका असलेल्या कोट्यवधी लोकांकडे जगाचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न
नोबेल समितीला यंदाच्या नोबेल शांतता पारितोषिकाच्या माध्यमातून करायचा आहे.
अन्नसुरक्षेचा उपयोग शांतता प्रस्थापित करण्याचे शस्त्र म्हणून करण्यात वर्ल्ड फूड प्रोग्रामची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
याशिवाय युद्ध व संघर्षाचे शस्त्र म्हणून उपासमारीच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी
सदस्य राष्ट्रांना एकत्रित करण्यात डब्ल्यूएफपीने भक्कम योगदान दिले आहे.
अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात उल्लेख केेल्या बंधुभावाप्रती ही संस्था सातत्याने काम करत आहे. संयुक्त राष्ट्रांची सर्वांत मोठी विशेषीकृत एजन्सी म्हणून वर्ल्ड फूड प्रोग्राम हे पीस काँग्रेसचेच आधुनिक स्वरूप आहे आणि नोबेल शांतता पारितोषिकांनी या पीस काँग्रेसेसचे कायम समर्थन केले आहे.वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या कामामुळे मानवजातीला झालेल्या लाभाचे जगातील सर्व राष्ट्रांनी समर्थन केले पाहिजे व त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असे नोबेल समितीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
डब्ल्यूएफपी चा परिचय –
डब्ल्यूएफपी ची स्थापना १९६१ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांच्या विनंतीवरून,
अन्नसहाय्य देण्याचा एक प्रयोग म्हणून, संयुक्त राष्ट्रांद्वारे करण्यात आली होती.
ही संस्था ८३ देशांत कार्यरत आहे आणि जगभरातील १०० दशलक्षांहून अधिक उपाशी स्त्री-पुरुष व लहान मुलांना
अन्न पुरवण्यासाठी या संस्थेचे कर्मचारी दररोज प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
त्यांच्या प्रयत्नांना नोबेल पारितोषिकाने मान्यता दिली आहे.
शहीद भगत सिंह : मी नास्तिक का आहे?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)