आता कार्यकर्त्यांना कसं तोंड दाखवायचं? असं म्हणत रामदास आठवले RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे समोर आले आहे.महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, रामदास आठवले यांनी आपल्या भावना मोकळेपणाने माध्यमांसमोर मांडल्या.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवला. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री यांचा समावेश झाला.
रामदास आठवले RPI ला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज
मात्र, महायुतीचे महत्त्वाचे सहयोगी पक्ष असलेल्या RPI ला या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. यावर आठवले म्हणाले, “महायुतीचा भाग असूनही शपथविधीला मला निमंत्रणसुद्धा आले नाही. निवडणुकीच्या वेळी मला सगळीकडे नेले जाते, पण आता आम्हाला विचारलेही गेले नाही. RPI ने विधानसभा निवडणुकीत चांगले काम केले. आमच्या समाजाने भाजपसोबत ठामपणे उभे राहून साथ दिली. तरीही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा देण्यात आली नाही.”
रामदास आठवले यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक वेळा चर्चा झाली. त्यांनी किमान एक विधानपरिषदेची जागा आणि एक मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अडीच वर्षांच्या सरकारमध्ये आमच्या पक्षाला एकही प्रतिनिधित्व मिळाले नाही. आता या विस्तारातसुद्धा आम्हाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे मला कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचे आहे, हे समजत नाही.”
आठवले यांनी आपल्या नाराजीचा पुनरुच्चार करताना सांगितले, “ प्रधानमंत्री मोदींनी मला केंद्रात मंत्रीपद दिले आहे, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र, ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवले त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी हा मोठा समूह आहे. अशा पक्षाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.”
ते पुढे म्हणाले, “आता दोन मंत्रीपद अजून बाकी आहेत मला आशा आहे की त्यामधून RPI ला संधी दिली जाईल.
यामुळे फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार नाही तर महायुतीमध्ये एकोपा देखील टिकून राहील.”
रामदास आठवले यांच्या या नाराजीमुळे महायुतीतील राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेल्या अस्वस्थतेचा सामना करण्यासाठी सरकारला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DE 16,2024 | 10:00 AM
WebTitle – ramdas-athawale-upset-over-rpi-ministerial-post-missing
#RamdasAthawale #RPI #MaharashtraPolitics #CabinetExpansion #DevendraFadnavis #MaharashtraGovernment