मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये सर्वकाही सुरळीत दिसत असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात दुफळी निर्माण होऊ लागली आहे. मुंबई काँग्रेसच्या एकागटाने वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. मुंबई काँग्रेसच्या 16 ज्येष्ठ नेत्यांनी दिल्ली हायकमांडला पत्र लिहून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर बोट दाखवलं आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला बळकटी द्यावी लागेल आणि गायकवाड यांच्याकडे त्यासाठी वेळ नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘वर्षा गायकवाड यांनी १३ महिने काहीच केले नाही’
गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनून जवळपास 13 महिने झाले असले तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी कोणतेही महत्त्वपूर्ण काम केलेले नाही, असा पक्षातील सूत्रांचा आरोप आहे. यापूर्वी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनीही सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई काँग्रेस युनिटकडून आपल्याला कोणतीही मदत न मिळाल्याचा दावा केला आहे.16 जून रोजीच्या पत्रात काँग्रेस नेतृत्वाकडे विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पक्षाच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला होता. सूत्रांनी सांगितले की, यातील बहुतांश नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
या पत्रावर काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी केली स्वाक्षरी?
मुंबई काँग्रेसच्या एका गटाने वर्षा गायकवाड यांना हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, १६ जून रोजी लिहिलेल्या पत्रावर राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि भाई जगताप, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री नसीम खान, माजी कॅबिनेट मंत्री सुरेश शेट्टी,वरिष्ठ उपाध्यक्ष मधु चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे कोषाध्यक्ष अमरजीत मन्हास, महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस झाकीर अहमद, बीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भूषण पाटील, शिवजी सिंग, युसूफ अब्राहाणी, संदेश कोंडविलकर आणि शशिकांत बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वर्षा गायकवाड यांनी नुकतीच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अशा स्थितीत त्यांना संस्थेत काम करायला वेळ मिळणार नाही. आगामी विधानसभा आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला रणनीती आखून मजबुतीने लढावे लागणार आहे. पत्रात गायकवाड यांच्या कार्यशैलीवरही आक्षेप घेण्यात आला आहे.
आंदोलनातच गटबाजी चव्हाट्यावर आली
यूजीसी-नेट परीक्षेशी संबंधित वादाबाबत महाराष्ट्रभर केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र या आंदोलनातच गटबाजी दिसून यायला लागली.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायवाड यांच्या नेतृत्वाखाली एमआरसीसी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आले,
तर दुसऱ्या गटाने जोगेश्वरी येथे आंदोलन केले.यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र हैराण झाला.
वर्षा गायकवाड यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे की जोगेश्वरीत आयोजित केलेल्या निदर्शनाला जावे, हे त्यांना समजत नव्हते.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 26,2024 | 08:36 AM
WebTitle – a campaign to oust Varsha Gaikwad,Ahead of the Maharashtra Assembly elections, there is a rift in the Mumbai Congress,