दिल्ली : शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे,दिल्ली चे मुख्यमंत्री अरविन्द केजरिवाल यांनी सभागृहात शेतकरी विरोधी काळ्या कायद्याची प्रतीकृती फाडली या मुद्यावरून भाजपच्या गुंडांनी आपचे दिल्ली जलबोर्डचे मंत्री राघव चढ्ढा यांच्या कार्यालयावर जीवघेणा हल्ला केला आला,असा आरोप जलमंत्री राघव चढ्ढा यांनी केला आहे.विशेष म्हणजे जय श्रीरामचा नारा देत हा हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यात सरकारी कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे.कार्यालयाच्या फरशीवर रक्त सांडल्याचे डागही दिसून येत आहेत.अशी माहिती जलमंत्री राघव यांनी दिली आहे. खालील व्हीडिओत आपण पाहू शकतो.
यानंतर जलमंत्री राघव चढ्ढा यांनी प्रेस कॉन्फरन्स हल्ल्याची माहिती दिली आहे.
जय श्रीराम चे नारे देत हा हल्ला करण्यात आले. खालील व्हिडिओत पाहता येईल.
जलबोर्ड मंत्री चढ्ढा यांनी स्त्री कर्मचाऱ्यांवर देखिल हल्ला केला असा आरोप केला आहे.
तसेच आम्हाला सुद्धा जीवे मारण्याचा धमक्या दिल्या असाही गंभीर आरोप केला आहे.
आपने भाजपावर केला आरोप
राघव चढ्ढा म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्याही कार्यालयात तोडफोड केली आहे. दिल्ली जल बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकारे सरकारी कार्यालयात घुसून हल्ला करणे हे अतिशय निंदनीय आहे आणि जल बोर्ड या प्रकरणी पुढे कडक पावले उचलेल. राघव चढ्ढा यांनी म्हटले की या हल्ल्यादरम्यान जल बोर्डाच्या मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. संपत्तीला हानी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी धमक्या दिल्या.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)