इंफाळ : मणिपूर मधील हिंसाचार काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. मणिपूर मध्ये पुन्हा एकदा गोळीबार होऊन हिंसाचार सुरू झाला आहे. मोरेह येथे बंदूकधाऱ्यांनी पोलिस कमांडोंना घेऊन जाणाऱ्या वाहनांना लक्ष्य केले आहे. मोरेहून ‘की लोकेशन पॉईंट’ (केएलपी) कडे जात असताना पोलिस कमांडोवर गोळीबार करण्यात आला. घटनेची पुष्टी करताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चाहनौ गाव ओलांडताना या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर आसाम रायफल्सच्या पाच कॅम्पमध्ये उपचार सुरू आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यानी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार, न्यू मोरेह आणि एम चाहनौ गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. मोरे येथेही दोन घरांना आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर एका तरुणाचाही मृत्यू झाला आहे.
मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात शनिवारी अज्ञात लोकांशी झालेल्या चकमकीत एका तरुणाचा मृत्यू झाला.
मणिपूरच्या मोरेह येथे शनिवारी दुपारी 3:50 वाजता अज्ञात बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाला,
त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दुपारी हिंसाचार सुरू झाला
इंफाळ-मोरेह रस्त्यावर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मोरे येथे दोन घरांना आग लागली. कुपमिंथांग असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी पहाटे 2.30 च्या सुमारास घडली, जेव्हा सशस्त्र लोकांच्या एका गटाने मणिपूरमधील जौप्पी येथे हल्ला केला आणि पहाडी गावाचे रक्षण करणार्या स्थानिक स्वयंसेवकांसोबत चकमक सुरू झाली.
हल्लेखोरांचा शोध सुरू आहे
दरम्यान, गावात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. बिष्णुपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यातील गावात तसेच आसपासच्या भागात तणावाचे वातावरण होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी शनिवारी मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात तरुणाच्या हत्येचा निषेध केला.
मुख्यमंत्री म्हणाले- गुन्हेगारांना सोडणार नाही
पत्रकारांशी बोलताना एन. बिरेन सिंह म्हणाले, “काही वाईट घटक राज्यातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही दुर्दैवी घटना असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
गुन्हेगाराला आम्ही सोडणार नाही.“
मुख्यमंत्री म्हणाले, ‘या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक नागरी संस्था, मीरा पाबी आणि संघटना प्रयत्नशील आहेत.
पण ही ताजी घटना अत्यंत निंदनीय आहे. आपण चर्चा करूया आणि वाटाघाटी करूया आणि आपापसात प्रश्न सोडवू आणि राज्यात शांतता प्रस्थापित करू.‘
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 30,2023 | 22:05 PM
WebTitle – Violence erupts again in Manipur, youth dies in arson, vandalism and stone pelting