मौजे वाघापुर, ता.भुदरगड (जि. कोल्हापूर) गावातील स्वागत कमानीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव बदलण्याचा नवा प्रस्ताव पुढे येताच वाघापुर येथील आंबेडकरी समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून, या पार्श्वभूमीवर ९ डिसेंबरपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे लॉंगमार्च काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.


आंबेडकरी समाजाने ४ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षाधिकारी, कोल्हापूर यांना निवेदन देत नावबदल प्रस्तावाला कडक विरोध नोंदवला. गावातील तलाव, गाडी तळ तसेच संबंधित जागा या महार–आंबेडकरी समाजाच्या मूळ मालकीच्या जमिनी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच ऐतिहासिक व सामाजिक आधारावर ग्रामपंचायत वाघापुरने स्वागत कमानीस “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान” हे नाव देण्याचा अधिकृत ठराव पूर्वीच मंजूर केला आहे.
२००८ पासून ग्रामपंचायतीचे चार ठराव — तरीही अंमलबजावणी नाही
वाघापुर ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २००६ , २६ जानेवारी २०१३, २६ जानेवारी २०१५ आणि २४ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या सभांमध्ये कमानीस डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पक्केपणाने मंजूर केला होता.
तरीही काही अधिकाऱ्यांनी नव्याने नावबदलाचा प्रस्ताव पुढे रेटल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
समाजाने २००८ पासून शासन दरबारी सर्व कागदपत्रे पाठवूनही आजवर अंमलबजावणी न झाल्याने असंतोष व्यक्त केला आहे.
“हा प्रस्ताव समाजावरील अन्याय व संविधानिक मूल्यांचा अवमान” — निवेदन
आंबेडकरी समाजाने अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की—
तलाव व त्यासंबंधित 0.09 गुंठे क्षेत्र हे परंपरेने आंबेडकरी समाजाच्या धार्मिक, सामाजिक उपयोगातील जागा आहेत.
7/12 उताऱ्यावरही या जमिनीची नोंद स्पष्ट आहे.
पुढे हा तलाव भर टाकून बुजवण्यात आला.आणि सर्व समाजासाठी जागेचा
अशा स्थितीत नावबदलाचा नवा प्रस्ताव आणणे हे समाजाचा अपमान असून, संविधानिक मूल्यांचा अवमान आहे.
समाजाने महाराष्ट्र शासनाच्या ५ जानेवारी २००० च्या शासन निर्णयाचा दाखला देत स्थानिक समाजाची संमती नसताना कोणत्याही सार्वजनिक स्थळाचे नावबदल करता येत नाही, हे स्पष्ट केले.
नागपूरकडे लॉंगमार्च — शेकडो अनुयायी सहभागी
या सर्व घडामोडींना उत्तर म्हणून वाघापुरातील दलित समाजाने नागपूरला जाणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दाद मागण्यासाठी लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉंगमार्च ९ डिसेंबरपासून सुरू होणार असून मोदी चौक – वाघापूर मार्गे हजारो अनुयायी नागपूरला जाणार आहेत.
समाजाने सर्व नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आंबेडकरी समाजाच्या निवेदनातून स्वागत कमानीचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हे नाव कायम ठेवण्याचा निर्धार स्पष्ट करण्यात आला आहे. गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह दिलेल्या या निवेदनानंतर नावबदलाचा प्रस्ताव मागे घेतला जावा, अशी विनंती समाजाने शासनाला केली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 08,2025 | 08:10 AM
WebTitle – waghapur-dalit-long-march-ambedkar-name-issue























































