पुणे: पुणे, ज्याला संस्कृतीचं माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखलं जातं, त्या शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साधारणतः एखादा कर्मचारी गंभीर आजारी पडल्यास कंपनीकडून त्याला रजा, आर्थिक मदत किंवा काही प्रमाणात सहाय्य मिळणं अपेक्षित असतं. परंतु पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीने मानवी संवेदनांना काळीमा फासणारा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्याला कर्करोग (कॅन्सर) झाल्याचं निदान झाल्यानंतर कंपनीने त्या कर्मचाऱ्याला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं. नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर पाहूया.
येरवडा परिसरातील कॉमर्स झोनमध्ये असलेल्या SLB या आयटी कंपनीने काही महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पदरम्यान कंपनीतील कर्मचारी संतोष पाटोळे यांना कर्करोग (थायरॉइड ग्लॅंडमध्ये) असल्याचं निदान झालं. हा अहवाल समोर आल्यानंतर सुरुवातीला कंपनीने त्यांच्या उपचारांचा काही खर्च उचलला. मात्र पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता संतोष यांना नोकरीतून काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्यानंतर संतोष यांनी न्यायासाठी कंपनीच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं आहे.
पुणे आयटी कंपनीचा धक्कादायक निर्णय: कॅन्सर झाल्यावर कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढले
सुरुवातीला झालेल्या तपासणीत कर्करोगाचा आलेला अहवाल पाहून संतोष पाटोळे यांनी मे आणि जून महिन्यात शस्त्रक्रिया व उपचारासाठी रजा घेतली.
डॉक्टरांनी जुलै महिन्यात त्यांना ड्युटीवर परतण्याची परवानगी दिली होती.
मात्र कामावर परतण्याच्या अगदी काही दिवसांपूर्वीच 23 जुलै रोजी कंपनीने त्यांना नोटीस पाठवली,
ज्यात त्यांच्या सेवेतून तत्काळ कमी केल्याचं नमूद होतं.
कंपनीने असा दावा केला की संतोष यांच्या निर्णयांमुळे एका प्रोजेक्टला दोन ते तीन कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.
मात्र संतोष यांच्या मते तो प्रोजेक्ट अजून सुरूही झाला नव्हता, त्यामुळे कंपनीचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
नोकरी गेल्यानंतर संतोष पाटोळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं. कंपनीने पुढील उपचारांसाठीचा खर्च पूर्णतः थांबवला.
त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत असताना रुग्णालयाचा सर्व खर्च त्यांच्या खांद्यावर पडला.
आर्थिक ताण, आजाराची भीषणता आणि कंपनीने अचानक केलेल्या वागणुकीमुळे त्यांची मानसिक स्थिती अधिकच ढासळली.
त्यांच्या कुटुंबावरही मोठा ताण निर्माण झाला आहे.
या प्रकरणाबाबत माध्यमांनी कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले, मात्र कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हक्काबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संतोष यांनी श्रम विभाग, मानवाधिकार संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला आहे. या प्रकरणामुळे कर्मचारी हक्कांसाठी मोठी चळवळ उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना पुण्यासारख्या प्रगत शहरात घडल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कर्मचारी सुरक्षेबाबत अधिक कठोर नियमांची मागणी जोर धरू लागली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 13,2025 | 08:52 AM
WebTitle – pune-it-company-cancer-employee-termination























































