01-12-2025 मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क (दादर) परिसरात कृतज्ञता आणि अभिवादनासाठी गर्दी करतात. या अनुयायांच्या सेवेसाठी जेवण, पाणी, आरोग्य, शिक्षण, संविधान जागृती, कायदेशीर मदत, आर्थिक साक्षरता अशा विविध निःशुल्क सेवाभावी उपक्रमांचे स्टॉल अनेक आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय संघटना तसेच स्वयंसेवी गटांकडून उभे केले जातात.
मात्र, यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या स्टॉल्ससाठी आकारलेल्या शुल्कामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.भरमसाठ शुल्क वाढ केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांची अडचण निर्माण झाली असून,जर एवढे शुल्क आकारले जात असेल तर पालिकेने तरतूद केलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या साठीचा फंड नेमका कुठे वापरला जातो असा रोकडा सवाल सामाजिक कार्यकर्ते भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अमोलकुमार बोधिराज यांनी विचारला आहे.
शुल्क दुप्पट नव्हे… थेट दोन-तीन पट वाढ!
दरवर्षी साधारणपणे २,००० रुपये देऊन उभारले जाणारे छोटे स्टॉल्स यावर्षी ५,११८ रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
अमोलकुमार बोधिराज यांनी महानगरपालिकेची रिसीटच शेअर केली आहे.

- शिवाजी पार्क परिसरात दरवर्षी ५०० पेक्षा जास्त स्टॉल्स लागतात.
- प्रत्येक स्टॉलसाठी ५,११८ रुपये आकारले तर एकूण २५,५९,००० रुपये इतका महसूल होतो.
यामुळे अनुयायी आणि स्वयंसेवी संस्था असा आरोप करत आहेत की,
“महापरिनिर्वाण दिनाच्या नावाखाली महानगरपालिका सेवा न देता व्यवसाय करत आहे.”
स्वयंसेवी उपक्रमांना आर्थिक फटका
महापरिनिर्वाण दिनी उभारले जाणारे बहुतांश स्टॉल हे:
- संविधान जागृती
- कायदेविषयक माहिती
- शिक्षणाविषयी मार्गदर्शन
- आरोग्य शिबिरे
- पिण्याचे पाणी, जेवण वितरण
- पुस्तके व अध्ययन साहित्य
यांसारख्या पूर्णपणे विनामूल्य सेवांसाठी असतात.
मात्र, शुल्कात झालेल्या या अचानक वाढीमुळे लहान संघटना आणि सेवाभावी गटांवर मोठा आर्थिक ताण येत आहे.
महानगरपालिकेच्या फंडाचा प्रश्न अनुत्तरित
महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला जातो. त्यामुळे अनुयायांमध्ये एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे:
“जर लाखो रुपये शुल्कातून आकारले जात असतील, तर महापरिनिर्वाण दिनाचा अधिकृत फंड कुठे खर्च होतो?” असा प्रश्न बोधिराज यांनी विचारला आहे.
अनुयायांमध्ये संतापाची भावना
या शुल्कवाढीमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
त्यांचे म्हणणे असे आहे:
“सेवा करण्यासाठी येणाऱ्या संस्थांकडून पैसे आकारणे म्हणजे अनुयायांवर अन्यायकारक असून महापरिनिर्वाण दिनाची भावना बाजूला ठेवून महानगरपालिका फायदे पाहत आहे.”
तत्पूर्वी या संदर्भात महानगरपालिकेकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, वाढीव शुल्क रद्द करावे आणि सेवा देणाऱ्या संस्थांना सवलत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हा मुद्दा आता राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 01,2025 | 19:20 PM
WebTitle – If lakhs of rupees are being collected as fees, where is the official fund for Mahaparinirvana Day being spent?























































