मुंबई: परभणी च्या घटनेवर आज देवेंद्र फडणवीस काय म्हणाले : पत्रकार परिषद प्रश्न उत्तरे : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडली,यावेळी त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.परभणीच्या घटनेत एक मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला,त्या मनोरुग्णाला अटक देखिल करण्यात आली,दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखिल झाला,यावर मला एक विनंती करायची आहे की अशाप्रकारे एक मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं हे योग्य नाही.ते बाबासाहेबांना देखिल कधीच मंजूर झालं नसतं. मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे.मी एवढच सांगतो की हे सरकार सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे.कुठल्याही परिस्थिती मध्ये तुसभरही संविधानपेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही.आम्ही सर्वांनी ज्या संविधानाची शपथ घेतलीय त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल.संविधानाचा गौरव करेल.हा विश्वास मी या निमित्ताने देतो.
एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारला की, गोमाता कापली जात आहे त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का?
– यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले की, “यासंदर्भात कारवाई करू आणि कायद्यानुसार जी जी बंधने आणता येतील ती आणू”
एक पत्रकाराने विचारलं परभणी घटनेत अर्बन नक्षल कनेक्शन आढळून आलं आहे का?
यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तसे काही आढळून आले नाही,पण तपास सुरू आहे.”
परभणी संदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, आम्ही पोलिसांना सूचना दिल्या आहेत.आकस बुद्धीने कारवाई करू नका,कोंबिंग ऑपरेशन करू नका,मात्र जे लोक कॅमेरा मध्ये दिसत आहेत,ज्यांच्या हातात दगड काठ्या दिसत आहेत तोडफोड करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करा.हे मी सांगितलेले आहे.
एका पत्रकाराने विचारलं दंगल खोरांवर कारवाई करण्याचा कायदा केलेला आहे.अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे.त्यांच्याकडून तो खर्च वसूली होणार का ?
यावर फडणवीस यांनी उत्तर दिले की, “कायद्यप्रमाणे निश्चित ती कारवाई केली जाईल.”
विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नाही
आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही.कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही.मात्र सभागृहात न बोलता तिथून पळ काढून मिडिया समोर जाऊन बोलायचं हे काही योग्य नाही,अशाप्रकारे बोलणं लोकशाही विरोधी आहे.सभागृहात बोलून मग मिडियासमोर आलं तर ती खरी लोकशाही आहे.पण सभागृहात बोलायचं नाही आणि मिडियासमोर जाऊन बोलायचं आशाप्रकारे ते जर लोकशाही चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असेच म्हणावे लागेल. असं यावेळी मुख्यमंत्री विरोधकांवर टिका करत स्पष्ट केले,
विरोधी पक्षाबाबत निर्णय काय घेणार?
या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारची भूमिका काहीही नसते,यात कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो,अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची कुठलीही अडवणूक यात नसेल आमचा कुठलाही दबाव यात नसेल.
एवढे सगळे प्रश्न विचारले गेले मात्र परभणीच्या घटनेत एक उच्चशिक्षित आंबेडकरवादी तरुण न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडल्याबद्दल ना पत्रकारांना संवेदना दिसली नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना.
मिलिंद धुमाळे
संपादक – जागल्याभारत
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2024 | 21:55 PM
WebTitle – What did Devendra Fadnavis say in Parbhani’s press conference today?