माजी भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी केले दुहेरी मतदान, स्पष्टीकरण ऐकून सगळे हैराण
New Delhi: बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी भाजप खासदार राकेश सिन्हा यांच्यावर दुहेरी मतदानाचा आरोप झाल्याने मोठा वाद उभा राहिला आहे. आरोपानुसार, राकेश सिन्हा यांनी दिल्ली आणि बिहार (बेगूसराय) या दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपांवर काँग्रेस आणि आप (Aam Aadmi Party) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. मात्र, राकेश सिन्हा यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, राजकारण इतके नीच पातळीवर जाईल याचा अंदाज नव्हता.मात्र या अशा स्पष्टीकरणामुळे सगळेच हैराण झाले आहेत.
त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे नाव आधी दिल्लीच्या मतदारयादीत होते,
मात्र बिहारमधील मानसरपूर (बेगूसराय) या त्यांच्या गावात राजकीय सक्रियता वाढल्याने
त्यांनी आपला पत्ता बदलून तिथे नोंदणी केली आहे.
इतकच नाहीतर अजब गजब म्हणजे सिन्हा यांनी आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
दिल्ली नंतर बिहारमध्ये मतदानाचा वाद
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना राकेश सिन्हा यांनी बेगूसरायच्या आपल्या गावात मतदान केले आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर काँग्रेस आणि आप ने त्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जुन्या पोस्ट्स दाखवत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले.
विरोधकांनी संविधानातील तरतुदी दाखवत म्हटलं की, एका नागरिकाला दोन राज्यांमध्ये एकाचवेळी मतदान करता येत नाही.
आप आणि काँग्रेसने भाजपवर ‘वोटर फ्रॉड’ केल्याचा आरोप केला आहे.
आप नेते सौरभ भारद्वाज यांनी दावा केला की,
सिन्हा यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीतील द्वारका भागात मतदान केले आणि आता बिहारमध्ये पुन्हा मत दिले.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा मुद्दा उचलत विचारले की, “एका व्यक्तीला दोन राज्यांमध्ये मतदान करण्याची परवानगी कोणत्या योजनेअंतर्गत मिळते?”
राकेश सिन्हा यांचे स्पष्टीकरण
राकेश सिन्हा यांनी स्पष्ट केले की त्यांचे नाव फेब्रुवारीत दिल्लीच्या मतदार यादीत होते, पण आता त्यांनी आपले नाव बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील मानसरपूर गावात बदलले आहे.
ते म्हणाले, “मी माझ्या मातीशी जोडलेला माणूस आहे. माझं पितृगाव बेगूसरायमध्ये आहे. मी सुट्टी घेऊन, खर्च करून गावात जाऊन मतदान केलं. जे लोक संविधानाच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित करतात त्यांनी शंभर वेळा विचार करावा.”
सिन्हा यांनी सोशल मीडियावर लिहिलं —
“मला अंदाज नव्हता की राजकारण इतकं नीच असू शकतं. माझं नाव दिल्लीच्या मतदार यादीत होतं, पण बिहारच्या राजकारणात सक्रिय असल्यामुळे मी ते बदललं. आता मी मानहानीचा दावा करावा का?”
त्यांनी अपडेटेड मतदार यादीचे फोटोही शेअर केले, ज्यात त्यांचा पत्ता मानसरपूर, बेगूसराय असा दिसत होता.
आपचा पलटवार
आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सिन्हा यांच्या स्पष्टीकरणावर प्रतिउत्तर दिलं —
“ जर राकेश सिन्हा दिल्लीतील मोतीलाल नेहरू कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, तर त्यांनी पत्ता कसा बदलला? राजकीय सक्रियतेसाठी मतदार पत्ता बदलणे आवश्यक आहे का?
बीजेपी लोकांना मानहानीच्या केसेसद्वारे घाबरवण्याचं काम करत आहे. सिन्हा यांनी 28 एप्रिलला बिहारमध्ये नवीन मतदार कार्ड बनवलं, पण 4 सप्टेंबरला दिल्ली युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (DUTA) निवडणुकीत मत मागत होते.”
भारद्वाज म्हणाले, “कायद्यानुसार, व्यक्तीने तिथेच मतदान करायचं असतं जिथे तो राहतो आणि काम करतो — आपल्या पितृगावी नाही.”
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 07,2025 | 10:00 AM
WebTitle – rakesh-sinha-double-voting-controversy-bihar-delhi























































