लखीमपुर खीरी: उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी जिल्ह्यात इटावा येथील सारखा एक रोचक प्रकार समोर आला आहे. येथे एका कथा वाचकावर सात दिवस आपली खरी जात ओळख लपवून कथा सांगितल्याचा आरोप करत लोकांनी गोंधळ घातला. लोकांचा राग वाढताना पाहून कथावाचकाने सार्वजनिकपणे मंचावरून माफी मागितली आणि तिथून निघून गेले. हा प्रकार लखीमपुर खीरीच्या खमरिया गावातील रामजानकी मंदिरात घडला. येथे श्रीमद्भागवत कथा सांगण्यासाठी आलेल्या कथावाचकावर ब्राह्मण समाजाने आरोप केला आहे की, त्यांनी आपली ओळख लपवून समाजातील लोकांना त्यांचे पाय स्पर्श करण्यास सांगितले.उपस्थित लोकांना जेव्हा सोशल मीडियाद्वारे कथावाचकाच्या जातीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा संतप्त ब्राह्मण समाजातील लोकांनी त्यांचा घेराव करत जाब विचारला.
लखीमपुर येथे जात लपवून भागवत कथा वाचन केल्याने वाद
सविस्तर प्रकरण असे की धौरहरा क्षेत्रातील खमरिया गावातील इटावा येथील राम जानकी मंदिरात श्रीमद्भागवत कथेचे आयोजन मंदिर समितीच्या लोकांनी आयोजित केले होते. सात दिवसीय कथेत कसब्यातील इतर लोकांसह ब्राह्मण समाजातील लोकही कथा ऐकण्यासाठी येऊ लागले. परंपरेनुसार सर्व लोकांनी कथा ऐकवणाऱ्या व्यक्तीचे पाय स्पर्श करून प्रणाम करायचा असतो,तसे करण्यात आले. संत वेश धारण करून पांढरे वस्त्र परिधान केलेल्या कथावाचक पारस मौर्य यांनी त्यांच्या पाया पडणाऱ्य सर्व लोकांना आशीर्वाद दिला. यामध्ये ब्राह्मण समाजातील लोकांचाही समावेश होता. बुधवारी ब्राह्मण समाजातील लोकांना माहिती मिळाली की, हा कथावाचक मौर्य समाजातील आहे आणि तरीही तो ब्राह्मण समाजातील लोकांना पाय पडण्यास सांगतो, तेव्हा रागाचा भडका उडाला. मोठ्या संख्येने लोकांनी कथा व्यास पीठावर कथावाचकाला घेरले.
कथावाचकाला सार्वजनिकपणे माफी मागण्यास सांगितले गेले

कथावाचक पारस मौर्य यांनी आपली ओळख लपवून स्वतःला पारसनाथ तिवारी, काशी विश्वनाथ येथील रहिवासी म्हणून सांगितले
आणि ब्राह्मण समाजातील व्यक्तींना पाया पडून घेतले गेले,तसेच जात लपवून कथा सांगितल्याची बाब मान्य करत सार्वजनिकपणे माफी मागितली.
त्यानंतर ते कथा सोडून निघून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खमरिया गावात राहणारे हरीश अवस्थी यांनी सांगितले की, आमच्या गावात एक ब्राह्मण वेशातील व्यक्ती आली आणि म्हणाली की आम्ही कथा वाचन करू. आम्ही त्यांचा सन्मान करत कथेचे आयोजन केले, परंतु सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल माहिती मिळाली की ते मैगलगंज येथील रहिवासी आहेत आणि ते ब्राह्मण नसून मौर्य आहेत. त्यांच्या गुरूशी बोलल्यानंतर त्यांची खरी ओळख समोर आली. आम्हाला असेही कळले की त्यावेळी काही ब्राह्मणांनी मौर्य यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यामुळे उपस्थित ब्राह्मण लोकांमध्ये राग निर्माण झाला, परंतु कथावाचकाने आता माफी मागितली आहे. आम्ही आता समाधानी आहोत.
मात्र यामुळे सोशल मिडिया उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एक है तो सेफ है असे हिंदू धर्मियांच्या एकीकरणाचे कॅम्पेन चालवले गेले होते,मात्र आता असे प्रकार समोर आल्याने लोक या कॅम्पेनबद्दल चर्चा करत प्रश्न विचारायला लागले आहेत.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 13 ,2025 | 07:00 AM
WebTitle – lakhimpur-paras-maurya-hides-caste-bhagwat-katha-controversy