मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात वस्तु फेकून मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. राकेश किशोर तिवारी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलाने हे कृत्य केलेले असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केली आहे.
या घटनेचा व्यापक स्वरूपात निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता धडकणार आहे. त्यात धारावीतील चर्मकार समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहे.
वकिलावर कठोरात कठोर कारवाई करावी
सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना ६ ऑक्टोबरला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी या वकिलाने हेतुपूर्वक इजा करण्याच्या उद्देशाने एक वस्तु फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही वस्तु गवई यांना लागली नाही.त्यामुळे ते बवाचवले.या घटनेचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटले. तिवारी याच्या या कृतीविरुध्द संपूर्ण देशामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वकिलावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेली आहे. या घटनेविरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे.
या असंतोषाला मोकळी वाट करुन देणे आणि या घटनेचा व्यापक स्वरूपात निषेध करण्यासाठी हा मोर्चा वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयावर बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. सरन्यायाधीशायांवर हल्ल्यांचा प्रयत्न करणाऱ्या ॲड. राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे,तसेच वस्तु फेकीचा हल्ला झाला तो दिवस म्हणजेच ६ ऑक्टोबर हा दिवस न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
हल्ला झाला तो दिवस न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा
जनमानसात संविधानाप्रती जागृती व आदर असावा यासाठी
देशातील प्रत्येक न्यायालयाच्या प्रांगणामध्ये हातामध्ये संविधान असलेला
महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. देशातील प्रत्येक न्यायालयातील न्यायाधीशांना कडक सुरक्षा देण्यात यावी.
देशाच्या व राज्यांच्या राजशिष्टाचारानुसार प्रत्येक न्यायाधीशाचा सन्मान ठेवण्यात यावा.
या सह इतर महत्त्वाच्या मागण्या संघटनेने केल्या असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी सांगितले.
राकेश किशोर तिवारी या विकृताने हल्ल्याचा केलेला प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो या देशाच्या संविधानावर व संविधान द्वारा स्थापित न्यायव्यवस्थेवर आहे. हे कृत्य अतिशय निंदनीय व अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. संबंधित घटनेमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी सदर घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी यावी. अशी मागणी बाबुराव माने यांनी केली आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 14,2025 | 09:58 AM
WebTitle – charmakar-community-protest-shoe-attack-cji-bhushan-gavai